ताज्या बातम्या
मराठी शाळांच्या गळचेपीविरोधात पालिकेवर मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारल्यानंतर हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलनएसआरएवर मोर्चा नेण्याचा धारावी बचाव आंदोलनचा इशारा* हजारो लोकांना धारावीबाहेर स्थलांतरीत करावे लागेल डीआरपीच्या भूमिकेने धारावीत संतापलेझीमच्या माध्यमातून महाराष्ट्राची शान थेट लाल किल्ल्यावरस्त्री हक्कांच्या नव्या पर्वाची सुरुवात : समानतेचा निर्धार…. महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची तीन दिवसीय राज्यव्यापी परिषद; २०, २१ आणि २२ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये स्त्री चळवळीचे नेतृत्व एका मंचावरअक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांचा साहित्य संमेलनासाठी खारीचा वाटा

देशात आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का ?

मुंबई(रमेश औताडे) : हलकीचे जीवन जगत असताना आमच्या झोपड्या तोडल्या जातात. आमची मुले संसार रस्त्यावर येत आहे. या देशात आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का ? असा सवाल मानवाधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर या जनतेच्या वतीने मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे यांनी केला आहे.

बोरिवली पश्चिम येथील पैनगर झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी सहाय्यक आयुक्त प्रफुल तांबे यांची भेट घेण्यात आली. पै नगर परिसरातील नागरिकांना वारंवार बेघर केले जात असल्याने सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे. पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही झोपडीवर कारवाई करू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. गरिबाना त्यांच्या हक्काचे घर मिळालेच पाहिजे. पुनर्वसनाशिवाय कारवाई करणे म्हणजे दुर्बल घटकांवर अन्याय करणे होय असे सचिन लोंढे यांनी सांगितले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top