ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

एका वर्षात ” समाजाचे देणं ” साडेपाच हजार कोटी

मुंबई(रमेश औताडे) : आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो अशी भावना ठेवली तर समाजातील अनेक प्रश्न मार्गी लागतील. आरोग्य शिक्षण कौशल्य विकास ग्रामविकास आदी सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी देशातील आघाडीच्या ७५ आय टी कंपन्यांनी एका वर्षात पाच हजार ४४३ कोटी रुपये सामाजिक दान दिले आहे.

सरकाने कायदा केला असल्याने देशातील आघाडीच्या टेक कंपन्यानी सामाजिक कल्याण म्हणून दोन टक्के हिस्सा गोरगरीब समाजाला सामाजिक दान म्हणून म्हणून दिला आहे. न्यास काम संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला त्यात ही माहिती प्रसिद्ध झाली आहे.मागील आकडेवारी सांगत असताना अहवालात अशी माहिती दिली आहे की, २०२२ साली १९ हजार पेक्षा जास्त कंपन्या या सामाजिक कल्याण योजनेत सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर २०२३ साली २२ टक्के कंपन्या वाढल्या आहेत.

सरकार अनेक योजना मार्फत सामाजिक विकास करत असते. तरीही विकास शेवटच्या माणसापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे सामाजिक कल्याण म्हणून खाजगी कंपन्या मार्फत सरकार विकास करत असते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय च्या जमान्यात आता टेक कंपन्या वाढत आहेत. रस्त्यांचा फंड वाढत आहे. असे या अहवालात स्पष्ट केले आहे.

Scroll to Top