ताज्या बातम्या

मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये २१ जुलैपासून ‘जनरल डब्बा’साठी रांगेची सक्ती; महिला, वृद्ध, विद्यार्थ्यांना दिलासा

प्रतिनिधी : भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक परिवहन मंत्रालयाच्या संयुक्त पुढाकारातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. २१ जुलै २०२५ पासून मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम मार्गावरील सर्व गाड्यांमधील जनरल डब्ब्यांमध्ये चढण्यासाठी रांगेची अट सक्तीची करण्यात आली आहे.

ही योजना प्रवाशांमध्ये शिस्त निर्माण करणे, महिलांना, वृद्धांना आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुलभ प्रवेश मिळावा, तसेच गोंधळ आणि झटापटीला आळा बसावा, या उद्देशाने राबवली जात आहे.

महत्त्वाचे ठळक मुद्दे:

  • ही रांग प्रणाली प्रथम टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार असून, एक महिन्यांनंतर प्रवाशांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन पुढील निर्णय घेतले जातील.
  • विशेषतः बदलापूरसारख्या प्रमुख स्थानकांवर ही अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार आहे.
  • स्टेशन परिसरात रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि GRP चे कर्मचारी नियंत्रणासाठी तैनात असतील.
  • रांगेत घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्य प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी सहकार्य करावे व प्रवासाच्या वेळेस रांगेतील शिस्तीचे पालन करावे.

संपर्क: रेल्वे ग्राहक सेवा केंद्र – टोल फ्री क्रमांक: 139

ई-मेल : publictransport@maharashtra.gov.in

सचिव, सार्वजनिक परिवहन मंत्रालय, महाराष्ट्र शासन व अधिक्षक, भारतीय रेल्वे यांच्या आदेशाने या सूचना देण्यात आल्या आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top