ताज्या बातम्या

मुंबई, ठाणे, नवी मुंबई

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

मोदीसरकारविद्यार्थ्यांसाठीहीशाप; NEET पेपरफुटीमुळे२३लाखविद्यार्थ्यांच्यास्वप्नांचाचुराडा – प्रा. वर्षागायकवाड

प्रतिनिधी : मोदी सरकारने तरुणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन फसवले, नोकर भरती केली नाही. परीक्षा देऊन भविष्य उज्वल करु पाहणाऱ्या लाखो मुलांच्या स्वप्नावरही सातत्याने पाणी फेरण्यात आले. आता NEET परीक्षेचा पेपर फुटल्याने २३ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वप्नांचा चुराडा आणि विश्वासघात केला. मोदी सरकार विद्यार्थांसाठीही शाप ठरले आहे असा घणाघाती हल्ला करत काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास पेपरफुटी विरोधात कठोर कायदा करण्याची काँग्रेसची गॅरंटी आहे, असा विश्वास मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात प्रतिक्रीया देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मोदी सरकारने १० वर्षांत विद्यार्थ्यांसाठी काहीही केलेले नाही. मोदी सरकारच्या नाकर्तेपणाची किंमत आजचा तरुण वर्ग चुकवत आहे. शिक्षण क्षेत्रालाही धार्मिक रंग देण्याच्या नादात भाजपा सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा केला आहे. उत्तर प्रदेशात पोलीस भरतीचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले, या आंदोलनाला राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला शेवटी जनतेचा रोष लक्षात घेऊन योगी सरकारला नमते घ्यावे लागले. महाराष्ट्रातही तलाठी भरतीचा पेपर फुटला असताना गृहमंत्री फडणवीसांनी मात्र तपास करण्याऐवजी पुरावे मागण्याचा निर्लज्जपणा केला. भाजपा सरकारमुळे तरुण पिढीचे अतोनात नुकसान झाले आहे. पेपरफुटी विरोधात कठोर कायदा बनवून करोडो प्रामाणिक तरुणांचे भविष्य वाचवण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या. आज सकाळी महाविकास आघाडीचे उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार भूषण पाटील यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी वाकोला, सांताक्रुज पूर्व येथील व्यापारी व स्थानिक रहिवाशी यांच्याशी संवाद साधला. कलिना विधानसभा मतदारसंघात रामदास चौक ते मॅच फॅक्टरी तसेच कुर्ला विधानसभा मतदारसंघातील पंचशील नगर ते पंढरीनाथ सेवा मंडल अशी जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या जनसंवाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मनोरंजन, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’  भेटायला   येत आहे अल्ट्रा झकास ओटीटीवर!

प्रतिनिधी : रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता ‘भुताटकी’ या शीर्षकात मराठीमध्ये पहायला

आरोग्यविषयक, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

दुचाकी अपघातात दुखापत झालेल्या ३४ वर्षीय व्यक्तीचे यकृत आणि फुफ्फुस वाचविण्यात डॉक्टरांना यश

प्रतिनिधी : दुचाकीच्या भीषण अपघातात यकृत आणि फुफ्फुसांना गंभीर दुखापत झालेल्या ३४ वर्षीय व्यक्तीचे यकृत आणि फुफ्फुस वाचविण्यात डॉक्टरांना यश

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

राहुल शेवाळे यांनी घेतला पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आशीर्वाद        रेवदंडा येथील निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट

प्रतिनिधी  : मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी बुधवारी सकाळी ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री, महाराष्ट्र भूषण

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

ब्रिटिश काळातल्या पोर्ट ट्रस्ट कामगार संघटनेला १०४ वर्ष पूर्ण

प्रतिनिधी(रमेश औताडे) : कोणतीही संघटना कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठी होते. त्यांच्या सहकार्यामुळेच संघटना वाढत असते.  त्यामुळे कामगार  संघटनेमध्ये कामगार कार्यकर्ते फार महत्त्वाचे

देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

अवयवदान वाढणे ही काळाची गरज – राजीव निवतकर

प्रतिनिधी(रमेश औताडे) : कोणत्याही ठिकाणी असूद्या प्रतीक्षा यादी असतेच. आरोग्य विभागही त्याला अपवाद नाही. आपले अवयव किती अनमोल असतात याची

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

आचारसंहितेत अडकला ” आनंदाचा शिधा “

प्रतिनिधी(रमेश औताडे) : हातावर पोट असणाऱ्यांनी रोज कमवायचे व रोजचा उदरनिर्वाह करायचा असे असताना शिधावाटप दुकानाचा आधार होता.पोटाची खळगी भरताना सरकारने

देश आणि विदेश, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

संविधान बदलण्याची तयारी सुरू आहे – तुषार गांधी

प्रतिनिधी(रमेश औताडे) : सामान्य माणसाला गुलाम केले आहेच.आता संविधान बदलण्याचे काम सुरू आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे मतदारांनी गांभीर्याने

कोल्हापूर, देश आणि विदेश, महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रत्नागिरी, सांगली, सातारा

मतदानाला जाताना तुमचा मोबाइल घरीच ठेवा ! फोन सापडल्यास गुन्हा नोंदवणार : निवडणूक प्रक्रियेत बाधा येण्याची भीती

मुंबई: लोकसभा निवडणुकीची थामधूम सुरू झाली आहे. मतदानासाठी मतदान केंद्रांवर जाताना काही गोष्टींची काळजी मतदारांनी घेणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावर

महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई

व्यवस्थापन लेखांकन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते लेखापालांच्या चर्चासत्राचे उदघाटन संपन्न

प्रतिनिधी : देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात व्यवस्थापन लेखापालांचे योगदान लक्षणीय असल्याचे सांगून तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट गाठताना तसेच

Scroll to Top