ताज्या बातम्या

जिंतीत प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथमेश पाटील व ऋतुजा जाधव ‘आदर्श विद्यार्थी’ पुरस्काराने सन्मानित

कराड : ग्रामीण विकास शिक्षण संस्था संचलित, श्री जोतिर्लिंग विद्यालय जिंती (ता. कराड) येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि विविध शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. *”सर्वांना साक्षर करून देशाला बलशाली बनवूया”* अशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली. या सोहळ्यात शैक्षणिक, क्रीडा व कला क्षेत्रात गरुडझेप घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
आदर्श विद्यार्थ्यांचा गौरव
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथमेश दत्तात्रेय पाटील याला ‘आदर्श विद्यार्थी’, तर कुमारी ऋतुजा रमेश जाधव हिला ‘आदर्श विद्यार्थिनी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान झाला.
क्रीडा व कला क्षेत्रात झळाळी
विद्यालयातील खेळाडू कुमारी पल्लवी ज्ञानदेव लोहार हिची जिल्हास्तरीय कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल, तिचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला व तिला मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षक श्री दिनकर वसंत आंबवडे सर यांचीही हार्दिक अभिनंदन क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यालयाचे ग्रंथपाल श्री जे एस साळुंखे यांचे अभिनंदन करण्यात आले तर कुमारी आर्या शहाजी देसाई हिने राज्यस्तरीय अधिवेशनात उत्कृष्ट नृत्य सादरीकरण केल्याबद्दल तिचा ‘कला गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या शौर्य विनायक पाटील याचाही विशेष सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शनाची शिदोरी
यावेळी बोलताना प्रशासकीय अधिकारी माननीय संताजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रामाणिक राहण्याचा सल्ला दिला. आयटी क्षेत्रातील उद्योजक श्री. अमर पाटील यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विद्यालयात मोफत ‘एआय’ (Artificial Intelligence) कोर्सेस राबवण्याची महत्त्वाची घोषणा केली. सीरम इन्स्टिट्यूटमधील संशोधक डॉ. दादासाहेब पाटील यांनी ‘नई शैक्षणिक धोरण २०२०’ नुसार व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रंथालयाची निकड व्यक्त केली व ग्रामस्थांना शाळेच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. नारायण झेंडे यांनी गावातील यशस्वी तरुणांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाळा आदर्श बनवण्याचे आवाहन केले.
विविध उपक्रमांचे आयोजन
कार्यक्रमाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक श्री. अशोक कोठावळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायती सादर केल्या. यावेळी जिंती येथील अभियंता युवकांनी लिहिलेल्या “चला स्वप्नाच्या दुनियेत जाऊया” या प्रेरणादायी पुस्तकाचे वितरण करण्यात आले. या पुस्तकाचा परिचय पत्रकार अमोल पाटील यांनी करून दिला. उपशिक्षिका सौ. वनिता कुंभार यांनी उपस्थितांना ‘साक्षरता शपथ’ दिली.

याप्रसंगी डॉ. दादासाहेब पाटील, सुधीर खोचरे, अजित माने (उपसरपंच, महारुगडेवाडी), आकाईवाडी व महारुगडेवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बक्षीस पात्रांचे वाचन श्री. संभाजी खोचरे व श्री. गणेश तपासे यांनी केले. आभार सौ. रूपाली माळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिपिक श्री. गणेश साळुंखे, सेवक श्री. संदीप मोहिते व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री संभाजी खोचरे यांनी केले

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top