ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

स्मशानभूमीतही कंत्राटदाराची मनमानी, मृतदेह घेऊन येणाऱ्या नागरिकांची गैरसोय;पालिका अधिकाऱ्यांचे कान डोळे बंद…

प्रतिनिधी(रमेश औताडे) : मरणानंतरही संकटांचा सामना करावा लागत असेल तर प्रशासन व लोकप्रतिनिधी नेमके करतात तरी काय ? असा सवाल स्मशान भूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन येणारे नागरिक करत आहेत.

पालिका स्थापन होण्याअगोदरची जुनी असणारी घणसोली सेक्टर ८ येथील (कौलआळी) स्मशानभूमीची विविध समस्यांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. मृतदेह जळीत केल्यानंतर राख स्मशानाच्या आवारातच टाकून दिली जात आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या आवश्यक सेवा-सुविधा नसल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना घाणीचा वास सहन करावा लागत आहे.

पालिकेने स्मशानभूमी व्हिजन अंतर्गत शहरात सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने सुशोभीकरणाच्या नावाखाली तात्पुरती डागडुजी करून रंगरंगोटी करत करोडो रुपयांचा मनमानी कारभार केला असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

दरमहा सरासरी २० ते २५ मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार केले जातात. स्मशानाच्या आवारात संरक्षण भिंतीलगत आरसीसी पीसीसी (प्लीथ) किंवा पेव्हर ब्लॉक लावण्यात न आल्याने उंदीर, घुशींचा तसेच सापांचा वावर आहे.

अनेक ठिकाणी कचरा जागीच जाळला जात असल्याने घाणीच्या साम्राज्यात येथील अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना नाक-तोंड दाबून यावे लागत असल्याची शोकांतिका आहे.त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले नागरीक संतप्त भावना व्यक्त करत आहेत.

Scroll to Top