ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

तंजावर-महाराष्ट्र मनोमिलनासाठी बाबाजीराजे भोसले यांचा पुढाकार

मुंबई(सदानंद खोपकर) “तंजावरमधील मराठी भाषिकांना त्यांच्या मूळ महाराष्ट्रातील गावांची ओळख होणं आवश्यक आहे. तंजावर आणि महाराष्ट्र यांच्यात मनोमिलन व्हावं, रोटी-बेटीचे संबंध दृढ व्हावेत,” अशी भावनात्मक प्रतिक्रिया तंजावरचे सध्याचे महाराज बाबाजीराजे भोसले यांनी आज येथे व्यक्त केली.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात बाबाजीराजे भोसले यांनी भेट दिली. अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

तंजावरमधील मराठी संस्कृतीचे जतन

महाराज भोसले म्हणाले की, “तंजावरमध्ये सध्या सुमारे तीन लाख मराठी भाषिक राहतात. काळ बदलला असला तरी आजही घरोघरी मराठी बोली जाते, सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. गोंधळ, भारूड, लावणी, फुगडी यांचा तिथे भरघोस प्रभाव आहे. समर्थ रामदास स्वामींचा मठ आणि कविंद्र परमानंदांचे ‘शिवभारत’ याची मूळ प्रत सुद्धा तिथे आहे.”

“मोडी शिकवणाऱ्यांची गरज”

“तंजावरमध्ये शेकडो वर्षांपूर्वीची मोडी लिपीतील कागदपत्रे उपलब्ध आहेत. ती वाचण्यासाठी मोडी जाणणाऱ्या जाणकारांची अत्यंत गरज आहे. मोडी अभ्यासक महाराष्ट्रातून पाठवावेत,” असे त्यांनी सुचवले.

संमेलन घेण्याचा विचार

तंजावरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा विचार सुरु असून, “मराठीची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी हे पाऊल उपयुक्त ठरेल,” असे आश्वासन महाराजांनी दिले.

शरद पवार यांची आठवण

बोलताना त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली. “मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री असताना त्यांनी तामिळनाडू सरकारला तंजावरकर मराठी बांधवांचा विचार करा, असे सांगितले होते,” अशी आठवण त्यांनी सांगितली

Scroll to Top