ताज्या बातम्या
‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणीमाजी पंतप्रधान स्व. चंद्रशेखर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त २३ जून रोजी मुंबईत व्यापक बैठकपुणे-नाशिक महामार्गाला समांतर रेल्वेसाठी शासनाने पुढाकार घ्यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनएअर इंडिया बिल्डिंगमधील ५० कंत्राटी कामगारांना दिलासा; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सहकार सेनेची यशस्वी पाठपुरावापुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ

संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना खोरीपा चा पाठिंबा – सलीम खतीब

प्रतिनिधी(रमेश औताडे) : लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान वाचवण्याकरिता इंडिया आघाडीला खोरीपा पक्षाने पाठिंबा दिला असल्याची माहिती खोरीपाचे मुंबई कार्याध्यक्ष सलीम खतीब यांनी ट्रॉम्बे येथील जाहीर सभेत सांगितले.

लोकसभा निवडणुकीमध्ये वातावरणात बदल होत आहे. देशातील जनतेने निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. विद्यार्थी दिशा बदलत आहेत. हे येणाऱ्या काळात दिसून येईल असे सलीम खतीब यांनी सांगितले.

हुकूमशाही सरकारच्या विरोधात देशातील वातावरण बदलले आहे. देशातील जनतेने आता ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सत्ता बदल होणार आहे. ज्यावेळी विद्यार्थ्यांनी परिवर्तन घडवून आणण्याचे ठरवले तर परिवर्तन होतेच, हे अनेकदा निदर्शनास आले आहे. सध्या ही निवडणूक देशातील विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यासाठी हातात घेतली आहे त्यामुळे येणाऱ्या चार मे रोजी देशात सत्ता परिवर्तन होणार आहे.असे सलीम खतीब यांनी सांगितले.

देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या संदर्भात कुठलेही वक्तव्य करण्यात येत नाही. दहा वर्षात सामान्य माणसाचा कुठल्याही प्रकारचा विकास करता आला नसल्याने सध्या कुठलेही मुद्दे प्रचारासाठी नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलणाऱ्या विरोधात एकजुटीने उभे राहण्यासाठी हा पाठिंबा दिला आहे.

Scroll to Top