मुंबई(रमेश औताडे) : शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे, हा संदेश लोकांच्या मनात रुजवण्यासाठी पंचमहाभूते फाउंडेशनच्या वतीने काजू पेरू आवळा जांभूळ सीताफळ पाम या फळझाडांचे संस्था व व्यक्ती यांना प्रत्येकी पाच झाडे वाटप केले .
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, शिवाजी पार्क येथे १५ जून २०२५ रोजी पंचमहाभूते फाउंडेशन आयोजित मुंबई फळोत्सव २०२५ हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम नुकताच संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मॉं के नाम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र या दोन संकल्पनांपासून प्रेरणा घेऊन पंचमहाभूते फाउंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. करण्यात आली.
नो बाथ डे, टू मिनिट्स शॉवर, से नो टू प्लॅस्टिक अशा अभिनव उपक्रमांचे आयोजन सोबतच अर्बन फॉरेस्ट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी मिळविण्यासाठी खड्डे अभियान, खिळे मुक्त झाड यासारखे उपक्रम एनजीओ राबवत असते. पर्यावरण विघ्नहर्ता ही राज्यस्तरीय पर्यावरणस्नेही मूर्ती आणि सजावट स्पर्धा हा पंचमहाभूतेचा एक विशेष उपक्रम आहे. सावरकर स्मारकचे अध्यक्ष रणजीत सावरकर, मंजिरी मराठे, आमदार चित्रा वाघ, अमली पदार्थ विरोधी शाखेचे समीर वानखेडे आणि पंचमहाभूते फाउंडेशनचे संस्थापक अमित सावंत, संतोष सावंत, अमोल परब व पदाधिकारी उपस्थित होते.