प्रतिनिधी(भीमराव धुळप)
: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, तापोळा, देवसरे, कादांटी व आसपासच्या १०५ गावांचे जनजीवन पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच विस्कळीत झाले आहे. निकृष्ट दर्जाच्या विकासकामांमुळे नागरिकांचा संताप उफाळून आला असून, सोमवार, दिनांक २३ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजता सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. महाबळेश्वर-तापोळा रस्ता: निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता तुटून वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. त्यामध्ये कुरोशी-येरणे रस्ता: गेल्या अडीच वर्षांपासून टेंडर मंजूर असूनही काम सुरु न झाल्याने देवसरे पुलाचे काम अचानक पावसाच्या तोंडावर सुरू. अतिवृष्टीमुळे रस्ता वाहून गेला. दरे- कादांटी (२२ किमी) रस्ता: साईट पट्टी खोदलेली असून एसटी व लाँच सेवा पूर्णतः बंद. झाल्यामुळे नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे. रस्ते व वाहतूक व्यवस्था बंद असल्याने आरोग्य, शिक्षण, कामधंदा व दैनंदिन गरजांवर मोठा परिणाम झाला आहे. एसटी प्रशासन जबाबदार नसून, ठेकेदारांची उदासीनता व काही अधिकाऱ्यांची मनमानी ही या संकटाची मुळं असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.