सातारा(अजित जगताप) : सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत भ्रष्टाचार व हप्तेबाजी बंद करण्यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे अधिकारी व दलाल बिथरले असून आंदोलन चिरडून टाकण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
दि: ७ मे रोजी लोकशाही मार्गाने निवेदन देऊन कामकाजामध्ये लोकशाही व प्रशासकीय बाब आणण्याची विनंती केली होती. दिरगाई केली तर धरणे आंदोलनाचा इशाराही दिला होता. परंतु, भ्रष्टाचाराने पोखरलेल्या साताऱ्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आंदोलकाचे दखल घेण्याऐवजी हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आर्थिक बळाचा वापर केला आहे. त्यामुळे आंदोलकांकडे फारच लक्ष दिले जात नाही. असा आरोप होत आहे. या उलट आंदोलनामुळे काही अधिकारी वर्गाचा भ्रष्टाचाराचा दर वाढला आहे. अशी माहिती आता प्रादेशिक कार्यालय एजंट लोक देऊ लागलेले आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनातून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक होत आहे. तसेच ज्यादा माल भरून वाहतूक केली जात आहे. विशेष बाब म्हणजे दुर्दैवाने अपघात झाल्यानंतर त्या वाहनाचे क्रमांक दिले जातात . त्यामध्ये किती माल होता ? त्याचे वजन किती ? याच्या जाणीवपूर्वक उल्लेख केला जात नाही. हाच भ्रष्टाचाराचा उगम आहे. दर महिन्याला काळ्या पिवळ्या तसेच खाजगी वाहन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून ७ ते ८ लाख रुपयांची वसुली केली जात आहे. यातील बराच वाटा हा इतर विभागाला सुपूर्द केला जात असल्यामुळे तेरे बीचूप और मेरी भी चूप असा कारभार सुरू आहे.
सातारकर वाहन चालक वैतागलेले असून सुद्धा त्यांना आपल्या व्यवसायामुळे फारसा आक्रमक अथवा ठोस भूमिका घेण्यास अडचणी येत असतात. त्यामुळे त्यांनी ऑल इंडिया पॅंथर सेनेकडे तक्रार केल्यामुळे ते आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाचे परिणाम म्हणून आंदोलकांची प्रकृती बिघडली असून सुद्धा त्यांच्यावर वेळेत उपचार होत नाहीत.
सध्या आदित्य गायकवाड मनोज जगताप आशिष मोरे विजय कांबळे अनिकेत गडचिरे ज्योती गंगावणे आधी आंदोलन करत असून हे आंदोलन तीव्र करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे
साताऱ्यातील आर.टी.ओ.च्या आंदोलनाने अधिकारी बिथरले…..
RELATED ARTICLES