प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य वने मंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली आणि सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात पालकमंत्री श्री.गणेश नाईक यांनी महामार्गावरील विविध भागांची बारकाईने पाहणी केली. महामार्गावर सध्या सुरू असलेल्या कामांचा वेग आणि दर्जा याबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विशेषतः पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती आणि आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या . त्याचबरोबर महामार्गावरील खड्डे, अर्धवट कामे आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या तात्काळ दूर करण्याचे आदेश देखील पालकमंत्र्यांनी दिले .
या पाहणी दौऱ्याप्रसंगी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंतजी सवरा, आमदार श्री. राजनजी नाईक, पालघर जिल्हाधिकारी श्रीमती इंदुराणी जाखड, वसई विरार महानगरपालिका आयुक्त श्री. अनिलकुमार पवार, माजी जिल्हाध्यक्ष श्री महेंद्र पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.