ताज्या बातम्या
परिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणारचिराग नगर रस्ता कामातील निकृष्ट वॉटर टेबल हटवले; सोशल मीडियावरील आवाजानंतर पालिकेची दखल

घनकचरा प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मुंबई(रमेश औताडे) : रहिवाशांचा विरोध डावलत कायद्याचे पालन न करता नागरी वस्ती जवळ तयार केलेल्या घनकचरा प्रकल्पामुळे मुळे भर पावसात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आजारी पडणाऱ्या उग्र दुर्गंधीमुळे अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबत योग्य त्या उपाय योजना करून नागरिकांना आधार द्यावा व त्यांच्या आरोग्याशी खेळणे थांबवावे. अशी मागणी ” ला शिमर ” या वसाहतीतील नागरिकांनी केली आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेने नागरी वस्तीपासून घनकचरा प्रकल्प उभारला आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ नुसार अशी कचऱ्याची डंपिंग ग्राउंड किमान २०० मीटर दूर असला पाहिजेत. डम्पिंग ग्राउंड जवळील वसाहतीतील रहिवाशांचा विरोध डावलून हा प्रकल्प उभारला असून त्याच्या दुर्गंधीने लोक हैराण झाले आहेत. काही रहिवासी घरे सोडून दुसरीकडे राहायला गेले आहेत.

महापालिकेने नियम धाब्यावर बसवून ४० मीटर उंच प्रकल्प उभारला आहे.पावसाळ्यात समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यामुळे या प्रकल्पाचे पत्रे उडून जात असून मोठी दुर्घटना होऊ शकते. नागरी वस्तीजवळ कचरा ओतला आहे. त्यावर रसायन फवारणी केली जात नाही. मातीचा थर ही टाकला जात नाही. संबंधित अधिकारी या प्रकरणी गंभीर नाहीत. स्वच्छता अधिकारी प्रकाश पवार यांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत नागरिकांच्या आरोग्यचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

Scroll to Top