ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

निखरे गावात कव्वालीचा जंगी सामना; संयुक्त जयंती उत्सव थाटात संपन्न

राजापूर(रमेश तांबे) : राजापूर तालुक्यातील डोंगरांच्या कुशीत वसलेल्या निखरे गावात भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांची संयुक्त जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन बौद्ध उत्कृष्ट मंडळ कपिलवस्तू निखरे, जागृती महिला मंडळ व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत वरील महान विभूतींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत गावातील नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दुपारी महिलांसाठी हळदी-कुंकवाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळी गावचे सरपंच, पोलीस पाटील तसेच अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

रात्री दहा वाजता मनोरंजनात्मक कार्यक्रमात कव्वालीचा रंगतदार सामना रंगला. या सामन्यात मुंबईचे प्रसिद्ध कवीगायक संदीप यादव यांच्यासमोर नागपूरच्या वैशाली किरण यांनी जोरदार टक्कर दिली. त्यांच्यासोबत कवी कोकणरत्न जनीकुमार कांबळे व श्रीपत कुसुरकर यांनीही आपल्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली.

सर्व कलाकारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. निखरे बौद्धवाडी, बौद्ध तरुण उत्कृष्ट मंडळ आणि कपिलवस्तू महिला मंडळ यांनी यासाठी पुढाकार घेतला.

Scroll to Top