ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

“घावरी गावात ‘शोध पाण्याचा, संकल्प शेतीचा’ उपक्रमाची सुरुवात”

घावरी,महाबळेश्वर : गेली दोन महिने घावरी ग्राम सेवा संघ, मुंबई यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या ‘शोध पाण्याचा, संकल्प शेतीचा’ या उपक्रमाला आज प्रत्यक्ष सुरुवात झाली. या उपक्रमाचा उद्देश पाणी व्यवस्थापन, शेतीतील सुधारणा आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे आहे.

कार्यक्रमात गावचे सरपंच मा. अकबरभाई शरवान, उपसरपंच मा. श्री विजय सकपाळ, मुंबई मंडळ अध्यक्ष श्री प्रकाश सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच प्रमुख मार्गदर्शक श्री रमेश सकपाळ, श्री तानाजी सकपाळ, श्री बाळकृष्ण सकपाळ, श्री किसन जाधव, ज्येष्ठ नागरिक श्री बापू दादा सकपाळ, श्री राजाराम सकपाळ आणि श्री महादेव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वांनी मिळून या उपक्रमाच्या माध्यमातून गावच्या शेती विकासासाठी आणि पाण्याच्या शाश्वत उपयोगासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत करत, पुढील टप्प्यांमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली.

Scroll to Top