ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

बीड मधील केज तालुक्यांतील सरपंचाची हत्या;कुटुंबाकडून न्यायाची मागणी

प्रतिनीधी : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं सोमवारी (९ डिसेंबर) अपहरण करून हत्या करण्यात आली असल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. संतोष देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय, निकटवर्तीय व मित्र परिवाराने त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कुठेच आढळून आले नाहीत. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींवर देखील कारवाई करण्याचं काम चालू असून त्यांना देखील लवकरच अटक केली जाईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे. तसेच गावकऱ्यांनी एका पीएसआयवर काही आरोप केले होते. त्यानंतर त्या पीएसआयचं लगेच निलंबन करण्यात आले आहे.

दरम्यान, “माझ्या पोटचा गोळा गेला आहे, आम्हाला सरकारने न्याय द्यावा”, अशा शब्दांत मयत संतोष देशमुख यांच्या आईने टाहो फोडला. तसेच “माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी”, अशी मागणी देशमुख यांच्या पत्नी अश्विनी यांनी केली आहे. टीव्ही ९ मराठीने मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी देशमुख कुटुंबाने सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे.

Scroll to Top