ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

लहान मुलांच्या कर्करोग जनजागृतीसाठी पदयात्रा

मुंबई (रमेश औताडे) : लहान मुलांमधील वाढता कर्करोग रोखण्याची नितांत गरज आहे. बदलती जीवनशैली व आहार विहाराचे बिघडले संतुलन पाहता या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. असे मत व्यक्त करत निरू फाऊंडेशनच्या अध्यक्षा काजल वाघेला यांनी मुंबई नरिमन पॉइंट ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनपर्यंत विद्यार्थी जनजागृती पदयात्रा फेरी काढली.

या जनजागृती पदयात्रे मध्ये सुमारे आठ शाळांमधील एन एस एस चे विद्यार्थी व गृहलक्ष्मी मिस इंडिया डॉ. फरजाना लकडावाला यांनीही सहभाग घेतला होता. त्यांनी कर्करोगाने पीडित मुलांना जवळ घेत मायेचा ओलावा दिला. कॅन्सरग्रस्त मुलांसाठी नेहमी काम करणाऱ्या नीरू फाउंडेशनच्या अध्यक्षा काजल वाघेला यांनी या पदयात्रेचे आयोजन केले होते. मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघाचे अध्यक्ष राहुल रामुगडे व आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Scroll to Top