ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

“लहुजी क्रांती मोर्चा” चा वर्धापन दिन १६ आगस्टला

मुंबई ( रमेश औताडे) : सत्यशोधक, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती व “यह आझादी झूठी है, देश की जनता भुखी है” या ऐतिहासिक घोष वाक्याला ७७ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त १६ आगस्ट रोजी सकाळी १० वाजता दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पू.) मुंबई येथे लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने ६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. मधुकर गायकवाड (अधीक्षक व पथकप्रमुख, मेडीसिन विभाग, जे जे हॉस्पिटल, मुंबई) तर प्रा. डी. आर. ओहोळ (राष्ट्रीय प्रधान महासचिव – बामसेफ) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऍड शेल्हाळकर,दीपक लोंढे, प्रा .पी. बी. लोखंडे,प्रा.डी.आर. कसाब व वरिष्ठ मार्गदर्शक अंकल सोनवणे उपस्थित राहणार आहेत.

अशी माहिती लहुजी क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य संयोजन समितीचे प्रदेशाध्यक्ष नितीन कांबळे व प्रा.विकास पाथरीकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Scroll to Top