ताज्या बातम्या
साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी… साताऱ्यात अननस फळाला मोठी मागणी, अननस खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीनारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठ

लाडकी बहीण’ योजनेसाठी पैसे नसतील तर..राज्यपालांचा बंगला विका – बच्चू कडूचा सरकारला घरचा आहेर

प्रतिनिधी : लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका, असे वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. इतकंच नाहीतर राज्यपालांचा तब्बल ४० एकरातील बंगला विकला तर १ लाख कोटी येतील, असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारलाच खोचक टोला लगावला आहे. कष्ट करणाऱ्यांसाठी देखील सरकारने एखादी चांगली योजना जाहीर करायला हवी. राज्य सरकारला एक चांगला सल्ला दिला आहे की, मुंबईत राज्यपालांचा बंगला आहे. हा बंगला ४० एकरात आहे. राज्यपालाला ४० एकरचा बंगला कशाला पाहिजे, त्यामुळे राज्यपालांचा तब्बल ४० एकरातील बंगला विकला तर १ लाख कोटी रूपये मिळतील, असे बच्चू कडू यांनी म्हटले असून सरकारला टोला लगावला आहे. तर चार ते पाच मजल्यांचा स्वतंत्र बंगला राज्यपालांना बांधून द्यावा, अशी खोचक टीकाही बच्चू कडू यांनी केली. इतकंच नाहीतर राज्यपालांसाठी असलेल्या बंगल्याची ४० एकरातील जागा विकून येणाऱ्या पैशातून कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना जाहीर करा, असंही बच्चू कडू म्हणाले.

Scroll to Top