ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

महायुतीचे ” पापपत्र ” प्रसिद्ध करून मुंबई काँग्रेस ने फुंकले निवडणुकीचे रणशिंग

मुंबई (रमेश औताडे) : सत्तेतून पायउतार होण्यासाठी काही महिने शिल्लक असताना , महायुती सरकारने आर्थिक योजनेच्या घोषणा देत जनतेला फसविण्याचा काम सुरू केले आहे. मात्र त्यांनी केलेल्या मनमानी कारभाराची पोलखोल आता आम्ही करणार आहे. असे सांगत खासदार वर्षा गायकवाड यांनी शनिवारी मुंबई काँग्रेस कार्यालयातील पत्रकार परिषदेत ” महायुतीचे पापपत्र ” प्रसिद्ध केले. आता आम्ही या पापपत्राच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असल्याचेही खा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

लाडकी बहिण, लाडका भाऊ, असे सर्व लाडके योजनेत येत आहेत. मात्र अदाणी सारख्या अनेक लाडक्या मित्रांना दिलेले कंत्राट, मलाईच्या योजना आम्ही आता या पाप पत्रातून बाहेर काढत आहोत. धारावी पुनर्विकास आणि अदाणी हे समीकरण अदाणी मित्रांनी इतके गुंतागुंतीचे करून ठेवले आहे की, अदाणी यांचे खिसे भरण्याचेच धारवीचे कंत्राट आहे असा आरोप खा. वर्षा गायकवाड यांनी केला.

लहान भाऊ मोठा भाऊ व जागांचे गणित पाहण्यापेक्षा महाराष्ट्र वाचविण्याचे काम आम्ही मित्रपक्ष करत आहोत असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. आ. विश्वजित कदम, मा. आ. मधु चव्हाण , प्रवक्ते सचिन सावंत, आनंद शुक्ला, सुरेशचंद्र राजहंस, युवराज मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Scroll to Top