ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पंढरपुरात भक्ताचा महापूर,प्रचंड रांगा; मुख्यमंत्र्यांनी कुटूंबासह केली पूजा

पंढरपूर – महाराष्ट्राचा आध्यात्मिक एकात्मतेचा सोहळा असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठूरायाच्या पंढरीत हजारो भक्तांची मांदियाळी जमली असून पांडूरंगाच्या दर्शनाची आस असलेल्या वारकऱ्यांच्या गर्दीने पंढरपूर गजबजून गेले आहे. आज सकाळपासूनच राज्याच्या विविध भागांतून आलेल्या दिंड्या पंढरपूर जवळच्या वेळापूरमध्ये दाखल होऊ लागल्या. मंदिराचा कळस दिसताच वारकर्यांनी विठूरायाच्या दर्शनासाठी धाव घेतली. आषाढी एकादशी निमित्ताने दर्शन घेणारे भाविक आज दुपारपासूनच दर्शन रांगेत उभे राहिले. दुपारपर्यंत ४५ हजार भाविकांची दर्शन रांगेत नोंद करण्यात आली.

राज्याच्या सर्वच भागातून एसटी, रेल्वे, खाजगी वाहनांच्या माध्यमातूनही लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. वारकऱ्यांची सुविधा व सुरक्षेसाठी प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने वारकऱ्यांसाठी चहा, फराळ व इतर वस्तूंच्या वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी जेवण, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, स्वच्छतागृहे, तसेच मुक्कामाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या वर्षीपासून विठूरायाच्या २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली असून व्हीआयपी दर्शनही बंद करण्यात आले आहे.

Scroll to Top