ताज्या बातम्या
नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त कोपरखैरणेत रंगले ‘खुले कवी संमेलन’; सौ. जयश्रीताई पाटील यांचा विशेष सन्मानआदानींच्या पथदिव्यांनी बोरीवली पूर्व उजळले ; नागरिकांना दिलासाराष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर‘थँक्यू आई-बाबा!’… चिमुकल्या स्पंदनच्या पत्राने पालकांचे डोळे पाणावले; साहित्यापेक्षाही मौल्यवान ठरली मुलाची कृतज्ञता; पोस्टातून आलेल्या पत्राने दाटला पालकांचा कंठडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सदिच्छा सामाजिक विकास संस्थेचा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न

“छत्र निजामपूर” नव्हे, आता “किल्ले रायगड ग्रामपंचायत” हवी!

रायगड : जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी स्थापन केली, तो ऐतिहासिक रायगड किल्ला आज ‘छत्र निजामपूर ग्रामपंचायत’ या नावाने ओळखला जातो, ही आपल्या अस्मितेला शोभा न लावणारी शोकांतिका असल्याचे मत व्यक्त होत आहे.

आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांची भेट घेऊन ‘छत्र निजामपूर’ हे ग्रामपंचायतीचे नाव बदलून ‘किल्ले रायगड ग्रामपंचायत’ असे करण्याची अधिकृत मागणी निवेदनाद्वारे सादर केली आहे.

या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रायगडवाडी, वाघेरी, हिरकणवाडी, नेवाळीवाडी, पेरूचादांड, आदिवासीवाडी यांसारख्या अनेक ऐतिहासिक वाड्यांचा समावेश आहे. छत्रपतींच्या राजधानीला तिचा गौरवशाली इतिहास सन्मान मिळावा, अशी भूमिका या मागणीमागे आहे.

या मागणीवर तातडीने निर्णय घेऊन रायगडला पुन्हा ‘किल्ले रायगड’ या नावाने ओळख मिळावी, अशी नम्र विनंती मुख्यमंत्री महोदयांना करण्यात आला आहे.

Scroll to Top