ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

भाजपा २०२४ ची निवडणूक जिंकली कशी? या ज्येष्ठ पत्रकार तुलसीदास भोईटे यांच्या पुस्तकाचे आज प्रकाशन

मुंबई-शुक्रवार (सदानंद खोपकर)- महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक-२०२४, मध्ये धक्का बसलेली भाजपा विधानसभेला मात्र महाविजय कसा मिळवू शकली या विषयावरील ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास यांनी अभ्यासपूर्वक लिहिलेल्या भाजप जिंकली कशी, या पुस्तकाचे प्रकाशन आज शुक्रवारी सायंकाळी
मुंबई मराठी पत्रकार संघात होत आहे.
भाजप जिंकली कशी, या पुस्तकात आकडेवारीसह आणि विश्लेषण करीत लेखक भोईटे यांनी आपले निष्कर्ष मांडले आहेत. २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचं कोडं यातून उलगडेल असा दावा ते करतात.
सायंकाळी ४ वाजता पत्रकारिता, साहित्य, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होत असलेल्या या प्रकाशन कार्यक्रमाआधी गुजरातमधील अहमदाबाद येथे घडलेल्या विमान अपघातात गेलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.

Scroll to Top