ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

कराड दक्षिणमध्ये पेरण्या लांबणीवर; खरीप पूर्व हंगामाच्या मशागतीला खंड

कराड दक्षिणमध्ये पेरण्या लांबणीवर; खरीप पूर्व हंगामाच्या मशागतीला खंड

कराड (प्रतिनिधी) : डोंगरी भागात मान्सूनपूर्व पावसाने वेळेआधीच हजेरी लावल्याने कराड दक्षिण तालुक्यात खरीप हंगामातील पेरण्या आणि मशागत लांबणीवर पडली आहे. शेतकऱ्यांच्या चिंतेत त्यामुळे मोठी भर पडली असून, भात खाचरात पाणी साचल्याने पेरणीस विलंब होण्याची शक्यता वाढली आहे.

येळगाव, येवती, घराळवाडी, भुरभोशी, गोटेवाडी या भागांमध्ये दरवर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात धुळवा पद्धतीने भातपेरणी केली जाते. मात्र यंदा मोठ्या प्रमाणावर पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतात मशागत करण्याची संधीच मिळाली नाही. परिणामी, खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या सुरुवातीच्या तयारीवरच पाणी फिरले आहे.

या भागातील जमीन खोलगट आणि पाणी साचणारी असल्याने अनेक शेतजमिनींमध्ये पाणी अडकून बसले आहे. त्यामुळे यंदाची पेरणी उशिरा होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. काही शेतकऱ्यांनी पाणी ओसरण्याची वाट पाहत दुसऱ्या पर्यायी पिकांच्या विचाराला सुरुवात केली आहे.

दरम्यान, पावसाने ओढे, नाले, लहान पाझर तलाव भरून वाहू लागले असले तरी विभागातील मुख्य धरणांत मात्र समाधानकारक साठा झाला नाही. यामुळे खरीप हंगामावर याचा नेमका काय परिणाम होणार, हे सांगणे कठीण ठरत आहे.

हवामान विभागाने पुढील चार दिवसांत पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मशागत आणि पेरण्या यावर अधिक अडथळे येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी वर्ग सध्या ढगांकडे डोळे लावून बसला असून, हवामान स्थिर होईपर्यंत पेरणीचे योग्य वेळापत्रक ठरवावे लागेल, अशी स्थिती आहे.

Scroll to Top