ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

स्थानिकांचा विरोध डावलून कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा अदानीच्या घशात – खा. वर्षा गायकवाड

प्रतिनिधी : धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली भाजपा सरकार मुंबईतील मोक्याचा जागा अदानीच्या घशात घालत आहे. कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा अदानीला देण्यास स्थानिक लोकांचा विरोध आहे. धारावीकरांचे पुनर्वसन धारावीत करायचे आहे तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जमिनी अदानीला का दिल्या जात आहेत असा संतप्त सवाल करून मदर डेअरीची जागा अदानीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाला काँग्रेस पक्षाचा व कुर्ल्यातील नागरिकांचा विरोध यापुढेही कायम राहिल असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बैठकीत आज कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा अदानीला देण्याचा निर्णय झाल्यावर त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ही जागा अत्यंत मोक्याची आहे, या जागेवर शेकडो वृक्ष आहेत. पर्यावरणासाठी अत्यंत महत्वाची जागा असून या जागेवर उद्यान व्हावे ही स्थानिकांची मागणी होती पण त्याला न जुमानता भाजपा सरकारने ही जागा अदानीला बहाल केली आहे. ही जागा देऊ नये यासाठी काँग्रेस पक्षाने स्थानिकांसोबत आंदोलने केली पण सरकार मात्र अदानीसाठी सर्व नियम धाब्यावर बसवून पायघड्या घालत आहे. आता आणखी एक नवीन बनाव रचत राज्य मंत्रिमंडळानं अदानीच्या फायद्यासाठी या जमिनीच्या सब लीजिंगचीही मान्यता दिली आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाच्या स्थानिक आमदाराने मदर डेअरीची जागा अदानी देऊ देणार नाही असे जाहीर केले होते, मोठी जाहिरातबाजीही केली होती मग आता काय झाले, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. स्थानिकांचा विरोध असताना सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, पण हा लढा थांबणार नाही. यापुढेही धारावीच्या हक्कासाठी आमचा लढा सुरुच राहिल व संघर्ष यापुढे तीव्र असेल असा इशाराही खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

Scroll to Top