माणसांच्या आयुष्यामध्ये काहींना नशिबाने राजघराण्यामध्ये जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे त्यांची नैतिक जबाबदारी अधिकच वाढते. अशावेळी मानवी मूल्य जपण्यासाठी अनेक गोष्टी स्वीकाराव्या लागतात. तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. तरीसुद्धा आपल्या कुशल नेतृत्वाने सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व विकसित करण्याचे अवघड कामगिरी जे करतात. ते इतिहास म्हणून कायमचे स्मरणात राहतात. सामान्यांचे बाबा महाराज आज वाढदिवसानिमित्त सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
सातारा ही छत्रपतींची राजधानी आहे. छत्रपतींचा प्रभाव संपूर्ण भारतावर आहे. तशाच पद्धतीने छत्रपतींच्या राजघराण्यातील व्यक्ती म्हणून आदरणीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले व त्यांचे बंधू सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय नामदार शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले तथा बाबा महाराज यांचा आदर सन्मान राखला जात आहे .हा सातारचाच गौरव आहे. याचा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे
आज सामान्यांचे बाबामहाराज यांचा ३० मार्च हा वाढदिवस दिवस आहे. या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी स्वागताचे व अभिनंदनचे व शुभेच्छाचे फलक दिसत असले तरी ते फक्त हिमनगाचे टोक आहे. कारण, सातारा जावळी मतदार संघातील वाड्या वस्ती खेड्यापाड्यात व गरीब कष्टकरीच्या झोपडपट्टी सुद्धा तेवढाच आनंद व्यक्त केला जात आहे. कष्टाच्या पैशातून असे गोरगरीब आपापल्या गावातील शाळेला किमान दोन वह्या पुस्तक देऊन आपला आनंद साजरा करत आहेत. हे खूप मोठे वैशिष्ट्य आहे. हाच आदरणीय बाबा महाराजांच्या कर्तव्य संपन्न गुणाचा विजय आहे. अशी विश्लेषकांची धारणा झालेली आहे. १९९४ साली मे महिन्यात सातारा तालुक्यातील शेंद्रे येथीलअजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी सलग दहा वर्ष सहकार क्षेत्रात आपला नावलौकिक प्राप्त केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि इतर अनेक संस्थेमध्ये ते सक्रिय सहभाग घेत आहेत. शिक्षणक्षेत्र व इतर क्षेत्रांमध्येही त्यांनी आपली चमकदार कामगिरी केलेली आहे.
पैशाच्या श्रीमंती पेक्षा मनाच्या मोठेपणाची श्रीमंती ही बाबा महाराजांचे व्यक्तिमत्त्व उंचीवर घेऊन जाते. सातारचे भाग्यविधाते स्वर्गीय माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी दिनांक ३० मार्च १९७३ रोजी आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा जन्म झाला. मुळातच राजबिंड व्यक्तिमत्व असलेल्या बाबा महाराजांना लहानपणापासून सामान्य माणसांमध्ये जाऊन त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याच्या मान मिळाला आहे. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व दिवसेंदिवस कमळाच्या फुलासारखे फुलत चाललेले आहे. चार वेळा मंत्री पदांनी हुलकावणी दिली तरीही संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आज त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचे ते सोने करत आहेत. राजकीय सर्व पक्षाचे नेत्यांसाठी ते बाबा महाराज आहेत.
लातूर सारख्या भूकंपप्रवण क्षेत्रामधील पालकमंत्री म्हणून अल्पावधीत त्यांनी केलेली चमकदार कामगिरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,एकनाथ शिंदेसाहेब यांनाही थक्क करणारे आहे. सार्वजनिक बांधकाम म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला दळणवळणाची सुविधा पुरवणारे खाते असल्याने राज्याच्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात अर्थकारण होत आहे .यामुळेच तर अनेक ठेकेदार त्यांच्याशी जवळीक साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा व्यवसायिक भाग आहे. त्यातील काही प्रामाणिक तर काहींच्या बदल चर्चा न केलेली बरी असेच आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सातारा जावळीतील ज्या चार दोन ठेकेदारांच्या विरोधात विरोधकांनी प्रचारक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या मुद्द्याची चांगलीच चर्चा झाली. परंतु ,लाडके नेते बाबा महाराज यांच्या अडचणीत वाढ होऊ नये. म्हणून कार्यकर्ते व मतदारांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. उलट सर्वाधिक मतदान देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पण, आता संधी साधू ठेकेदारांच्या विरोधात अनेक आंदोलन होत आहेत. कामवाटप समितीचे ठराविक ठेकेदार आपले रांजण भरण्यातच धन्यता मानत आहेत. त्यांचे नेतृत्व करणाऱ्या ठेकेदाराविरोधात भविष्यात मोठे रान उठले तर नवल वाटणार नाही. अशा ठेकेदारांपासून बाबा महाराजांनी व त्यांच्या समर्थकांनी विचार करणे गरजेचे आहे .कारण, सामान्य माणसांचा नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा. अशी स्वप्न सामान्य सातारकर मनापासून वाट पाहत आहेत. तेवढी क्षमता नक्कीच बाबा महाराजांकडे आहे. हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. हे स्पष्टपणे सामान्यांसाठी नमूद करत आहे.
आज आदरणीय बाबा महाराजांच्या कामाचा व कर्तव्याचा आलेख पाहिला तर भविष्यात खूप मोठी संधी आहे . पुन्हा एकदा इतिहासामध्ये सातारा छत्रपतींची राजधानी म्हणून लोकशाहीत उभारणे फार अवघड नाही .यासाठी काही गोष्टींचा विचार करावा.हीच मापक अपेक्षा सामान्य कार्यकर्ता करत आहे.
सातारा- जावळी मध्ये प्रामाणिक व होतकरू तसेच आपापल्या भागाचा विकास करण्यासाठी झटणारे ठेकेदार आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामाची अधिकारी सुद्धा नोंद ठेवत आहेत. त्यांच्याबद्दल कुणाचेही दुमत नाही. उलट, त्यांच्या प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे सातारा जावळीचा विकास झाला आहे. होत आहे आणि भविष्यात होणार आहे. पण, काही व्यवसायिक ठेकेदार सर्व क्षेत्रात त्याला गालबोट लावण्याचा महापराक्रम करत आहेत. आर्थिक निकषामुळे सामान्य माणसांना त्यांच्याबद्दल जाहीर रित्या तक्रार करणे परिस्थितीनुसार शक्य होत नाही. त्यामुळे या लेखाच्या माध्यमातून तशा पद्धतीने मांडणी करत आहे. यामध्ये कुणाचा अवमान करणे हा हेतू नाही.
आज वाढदिवसानिमित्त कर्तव्यदक्ष बाबा महाराजांच्या सारख्या लाडक्या नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी वाड्या वस्ती व डोंगर कपारीतून आलेल्या सामान्यांनी केलेली गर्दी ही फक्त बाबा महाराजांसाठी आहे. त्यामुळे इतरांनी त्यावर आरूढ होऊन आपली छबी चमकवण्याचा प्रयत्न करू नये. अशी विनंती यानिमित्त सातारा जावळी मतदार संघातील सामान्य माणसांनी केलेली आहे. .याची लाडक्या नेत्यांनी नोंद घ्यावी. हीच माफक अपेक्षा आहे.
तूर्त बाबा महाराजांना वाढदिवसानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा देताना मतदार संघातील खेड्यापाड्यातील वाड्या वस्तीतील कष्टातून मिळवलेल्या पैशातून शालेय साहित्य वाटप केल्याने गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची गोडी लागलेली आहे. त्या बाल चिमुकल्यांचाही चेहऱ्यावरील हास्य बाबा महाराजांसाठी निश्चितच फलदायी ठरणार आहे. हे आवर्जून नमूद करतो.. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो .धन्यवाद
— पत्रकार अजित जगताप, सायगाव, तालुका जावळी, जिल्हा सातारा,
मोबाईल नंबर 99 22 24 12 99
__________________________________
फोटो -आदरणीय मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले