ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

महाराष्ट्र राज्यातील ‘या` भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा..!

प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्यानं होणारे बदल नवनवीन समस्य़ा निर्माण करताना दिसत आहेत.
ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे.
तर दुसरीकडे हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली असून विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा
(30-40 किमी प्रतितास वेग)
हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

खालीलपैकी या जिल्ह्यांत असणार उष्णतेची लाट :

  • रायगड
  • रत्नागिरी
  • जळगाव
  • नाशिक
  • सोलापूर
  • बीड
    इशारा : तडक उन्हातून आल्यानंतर थंड पाणी सेवन करू नका
    उघड्या डोक्याने उन्हामध्ये फिरू नका.
    शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घोट घोटभर सातत्याने पाणी पीत राहा.
    बाहेरील शीतपेय कटाक्षाने टाळा..
    त्या ऐवजी नारळ पाणी उसाचा रस ताक किंवा साधे पाणी प्या
Scroll to Top