ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी..” कामगार पालक दिना ” चे आयोजन

मुंबई : स्थानिक पातळीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या छोट्या-मोठया समस्या तात्काळ सोडविण्यासाठी विभाग नियंत्रक यांनी दर सोमवारी व शुक्रवारी विभागातील एका आगारात जाऊन ” कामगार पालक दिन ” घ्यावा. ज्यामध्ये आगारातील चालक- वाहक, यांत्रिक कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी ऐकून घेऊन तिथेच तातडीने निराकरण करावे, अशा सूचना एसटी महामंडळाचे मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी एसटीच्या स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार १५ जुलै,२०२४ पासून दुपारी ३ ते ५ या वेळे ” कामगार पालक दिन ” आयोजित करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळात सध्या सुमारे ९० हजार कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. एसटी महामंडळ हे खऱ्या अर्थाने ९० हजार कर्मचाऱ्यांचे विशाल कुटुंब आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा समाधानी असेल तर त्याची मानसिक स्थिती उत्तम राहते. त्यामुळे तो आपल्या कर्तव्यामध्ये शंभर टक्के योगदान देऊ शकतो. स्थानिक पातळीवर चालक- वाहक, यांत्रिकी कर्मचारी यांना रजा, डयुटी, वेळापत्रकातील त्रृटी, बदल्या, बढत्या, वरीष्ठांची कार्यपद्धती, विश्रामगृह, तेथील स्वच्छता या बाबतीत अनेक तक्रारी वजा समस्या असतात. या तक्रारी आपल्या वरिष्ठांनी ऐकून घ्याव्यात व त्यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी त्यांची किमान अपेक्षा असते. कर्मचाऱ्यांचे अनेक किरकोळ प्रश्न केवळ योग्य अधिकाऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने अनुत्तीर्ण राहतात. यावर उपाययोजना म्हणून विभाग नियंत्रक यांनी त्यांचे “पालक” बनुन त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात व तातडीने त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून दैनंदिन कामाबाबत असलेल्या छोट्या मोठ्या समस्या व तक्रारी मुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होणारी अशांतता संपुष्टात येईल. त्यांची मानसिक स्थिती सुदृढ राहिल व ते कामाच्या ठिकाणी उत्साहाने कार्यरत राहतील. हा या ” कामगार पालक दिनाचा ” मुख्य उद्देश आहे.

Scroll to Top