ताज्या बातम्या

धारावी कोळीवाड्याचे बाह्य सीमांकन व विस्तारित जमीन निश्चित करा, तोपर्यंत DRP चे कोणतेही सर्वेक्षण करु नका. – खासदार वर्षा गायकवाड.

प्रतिनिधी :धारावी कोळीवाड्याचा धारावी विनाश प्रकल्पात समावेश नसतानाही कोळीवाड्याची बाह्य सीमा चुकीची दाखवून अदानी आणि कंपनीकडून स्लम सर्वेक्षण केले जात आहे हे गंभीर असून भूमिपुत्रांच्या जमिनी व त्यांचे भविष्य हडपण्याचे हे षड्यंत्र आहे. धारावी कोळीवाड्याचे बाह्य सीमांकन व विस्तारित जमीन निश्चित करा आणि तोपर्यंत DRP चे कोणतेही सर्वेक्षण करु नका, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांनी केली आहे.धारावी कोळी जमात ट्रस्टने आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चात खासदार वर्षा गायकवाड यांनी सहभाग घेतला. यावेळी अदानी सरकारच्या राक्षसी आणि मुंबई विरोधी वृत्तीच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवले.याविषयी बोलताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, गावठाणे आणि कोळीवाडे हे मुंबईच्या अस्तित्वाचा आणि सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहेत. मात्र आपल्या बिल्डर आणि उद्योगपती मित्रांचे हित साधण्यासाठी भाजपा महायुती सरकार भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा आणण्याचे कटकारस्थान रचत आहे. ही लूट धारावी कोळीवाड्यापूरतीच मर्यादित नाही तर काही महिन्यांपूर्वी कुर्ला येथील ख्रिश्चन व्हिलेज आणि वांद्रे येथील चिंबई गावठाणांना स्लम घोषित करून सर्वेक्षण करण्यासाठी नोटीस दिल्या होत्या. पण दक्ष नागरिकांनी आणि काँग्रेसने आवाज उचलल्यावर हे सर्वेक्षण थांबवण्यात आले.मुंबईतील गावठाणे आणि कोळीवाडे हे स्लम नाहीत असा स्पष्ट शासन आदेश असूनही गावठाणे आणि कोळीवाडे यांना स्लम घोषित करून भूमिपुत्रांच्या जमिनी व हक्कांवर हेल सरकार गदा आणू पहात आहे. मुंबईच्या भूमिपुत्रांना झोपडपट्टीवासी कसे म्हणता येईल? मुंबईतील सर्व गावठाण आणि कोळीवाड्यांचे बाह्य सीमांकन निश्चित करून त्यांची मॅपिंग मुंबईच्या विकास आराखड्यात करण्यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आला आहे. भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठीचा आमचा हा लढा यापुढेही सुरूच राहील असे खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top