ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; विजयी मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर घोषणा

प्रतिनिधी : विजयी मेळाव्याच्या मंचावर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. “पुढे काय होईल सांगता येत नाही, पण ही मराठीची एकजूट अशीच कायम राहावी,” अशी भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

“बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं, हीच इच्छा आहे,” असंही त्यांनी भाषणाच्या शेवटी सांगितलं.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, “आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं हेच अधिक महत्त्वाचं आहे,” असे मत व्यक्त केले.

ठाकरे बंधूंनी एकमेकांबद्दल सकारात्मक भाष्य केल्याने आणि एकत्र येण्याची जाहीर घोषणा केल्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

या मेळाव्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची सुरुवात झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Scroll to Top