सातारा (अजित जगताप) : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी मिनी मंत्रालय म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना केली. त्या सातारा जिल्हा परिषद मुख्यालयात जेवणाच्या सुट्टीतही प्रामाणिक अधिकारी व कर्मचारी कार्यालयातच हजर असतात. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या जेवणाच्या सुट्टीत घरी जाण्याचा नवीन पायंडा पडला असला तरी प्रामाणिकपणाने कार्यालयात थांबून जेवणाची सुट्टी कारणी लावली जात आहे. ही वेळेची बचत नक्कीच मार्गदर्शक ठरली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सातारा जिल्हा परिषदेमध्ये ५५१५ प्राथमिक शिक्षकांच्या सेवेबाबत तसेच इतर १६ विभागाच्या कामकाजासाठी वर्ग तीन-चार कर्मचारी असतात. एकूण ७३१५ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील बहुतेक अधिकारी व कर्मचारी इमाने इतबारे नोकरी करतात. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या वेळी आपापल्या घरातून जेवणाचा डबा आणतात. तर काहीजण साताऱ्यात जवळ असलेल्या घरी जाऊन दुपारच्या भोजनाचा आस्वाद व आराम घेतात. हे आता लपून राहिलेले नाही. जिल्हा परिषदेच्या वार्षिक ७६ सुट्टी आहेत. तसेच दुसरा आणि चौथा शनिवार सुद्धा सुट्टी असले तरी अनेक प्रामाणिक अधिकारी व कर्मचारी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यालयात हजर असतात. हे सुद्धा नमूद करावे वाटत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे जाब कोण विचारणार ? अधिकारी वर्ग हे जिल्हा परिषदेच्या शेजारीच राहत असल्यामुळे ते त्वरित उपलब्ध होतात. परंतु, काही कर्मचारी सकाळी चहाला दुपारी जेवणासाठी घरी आणि लग्नसराई यात्रेच्या कालावधीत खाजगी कार्यक्रमासाठी सायंकाळी निघून जातात. हे नित्याची बाब झाली आहे. बिचारा प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या हितासाठी दिलेली जबाबदारी काटेकोरपण पाळावी लागते.
जनतेस शासकीय सेवा व योजना वेळेत आणि प्रभावीपणे पोहोचवणे, समस्या व तक्रारींचे निराकरण करणे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या योजनांसाठी निधी पुरविणे व अंमलबजावणी सुनिश्चित करणे.जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत पातळीवरील प्रशासकिय यंत्रणा यांच्यात समन्वय साधणे.
राज्य व केंद्र सरकाराच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासकिय व खर्चाची तपासणी करणे.
जि. प. व पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांना विविध विषयांचे प्रशिक्षण देणे, जेणेकरून त्यांच्या कार्यक्षमता आणि कार्यकुशलतेत वाढ होईल.जि. प. सामान्य प्रशासन विभाग हा विविध शासकिय योजनांच्या अंमलबजावणीसाठी आणि प्रशासनाच्या विविध बाबींमध्ये समन्वय साधण्यासाठी काम करणे अशा प्रामाणिकपणाने जबाबदारी पार पाडणारे सातारा जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी हे कौतुकास पात्र आहेत. त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वप्न साकार झाले आहे. याला गालबोट लावण्याचाही प्रकार सरस सुरू झालेला आहे. यावर आता अंकुश ठेवण्याची वेळ आलेली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेले अनेक कर्मचारी पूर्वी ग्रामीण भागातून येत असल्यामुळे ते घरून दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन येत होते. अलीकडच्या काळात गड्या आपले शहर बरे असे समजून अनेक जण सातारा शहर परिसरात राहण्यास आलेले आहेत. दुपारच्या जेवणासाठी घरी जाणे. हा काही कर्मचाऱ्यांचा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. अशा अविर्भावात जि. परिषदेमध्ये वागत आहेत. या उलट ज्यांना नोकरीची व जबाबदारीची जाणीव आहे. ते जेवणाच्या सुट्टीतही कामकाज करताना दिसत असतात. त्यामुळेच तर खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद सुरू असल्याचा अनुभव येत आहे. दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत म्हणजे दोन तास काहींची जेवणाची सुट्टी असते. बहुदा अनेकांना घरी जाऊन स्वयंपाक करावा लागत असेल. असे शासकीय कामासाठी भेटीसाठी आलेल्या काही अभ्यागताना वाटत आहे. हा विनोद असला तरी सर्वांनीच आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
काही जबाबदारी व नियम पाळण्यापेक्षा कर्तव्याचे पालन करणे आवश्यक बाब आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्येच असा प्रकार घडत नसून सर्व शासकीय कार्यालयात जेवणाची सुट्टी म्हणजे अनाधिकृत सुट्टी असे काही जण मानतात हे थांबवणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणात असंतोष पसरल्यास लोकशाही आंदोलनातून पॉवर दाखवावी लागेल. असाही इशारा देण्यात आलेला आहे.
______________________________
चौकट– सातारा जिल्हा परिषदेमध्ये पूर्वी पदाधिकारी व सदस्य- सदस्या यांची वर्दळ होत असे. आता कर्मचाऱ्यांपेक्षा राजकीय ठेकेदारांचीच मुख्यालयात गर्दी दिसून येत आहे. अशी तक्रार काही कर्मचाऱ्यांनी केली आहे.
______________________________
फोटो ,– सातारा जिल्हा परिषद मुख्यालय (छाया– अजित जगताप सातारा)