ताज्या बातम्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाँग मार्च’ स्थगित; पाणी संघर्ष चळवळीचा निर्णयपरिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणार

महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकसंवाद वाढवणे फार गरजेचे आहे – भूषण गगराणी आयुक्त


मुंबई: प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकसंवाद वाढवावा. लोकसंवादातून नागरिकांच्या प्रतिक्रियांची नोंद घ्यावी, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लोकसंवाद खूप आवश्यक आहे. तसेच विभागप्रमुखांनी आपापसात समन्वय ठेवावा असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केले आहे.
मुंबई महापालिकेची मुदत संपल्यामुळे महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकांची राजवट सुरू आहे. नागरिक आणि प्रशासनातील दुवा असलेले नगरसेवक सध्या नसल्यामुळे अधिकारी आणि नागरिकांमधील संवाद संपला आहे. मात्र हाच संवाद वाढवावा असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारच्या आढावा बैठकीत दिले. गगराणी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, नागरी सेवा-सुविधांशी संबंधित प्रश्न हे प्रशासकीय कार्यवाहीप्रमाणेच समाजाशी, नागरिकांशी संबंधित असतात. जटील प्रश्नांची प्रशासकीय उत्तरे शोधता येतात. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकसंवाद वाढवणे फार गरजेचे आहे. कारण, लोकसंवाद हे नागरिकांच्या प्रतिक्रियांची नोंद घेणे, त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे योग्य निराकरण करणे आदींसाठी महत्वपूर्ण आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विभागांनी आपापसांत उत्तम समन्वय ठेवावा, असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले.

Scroll to Top