मुंबई : प्रजा फाउंडेशनने ‘मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड २०२६’ हा अहवाल प्रसिद्ध केला असून, १५व्या विधानसभेतील मुंबईच्या आमदारांच्या कामगिरीबाबत चिंताजनक चित्र समोर आले आहे. हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५ या कालावधीत मुंबईतील आमदारांनी एकूण २,२१३ प्रश्न विचारले. १२व्या विधानसभेतील ७,९५५ प्रश्नांच्या तुलनेत ही संख्या तब्बल ७२ टक्क्यांनी कमी आहे.
रिपोर्ट कार्डमधील आघाडीचे तीन आमदार
काँग्रेस | गुण : ८२.८९
नागरिकांचे प्रश्न सभागृहात मांडणे, प्रश्न विचारणे, विधानसभेच्या कामकाजात सक्रिय सहभाग आणि उपस्थिती या विविध निकषांवर अमिन पटेल यांची कामगिरी सरस ठरली.
द्वितीय क्रमांक — अस्लम शेख
काँग्रेस | गुण : ८०.५८
नागरिकांच्या प्रश्नांना सभागृहात प्रभावीपणे मांडण्यासोबतच विधानसभेच्या कामकाजातील सहभाग आणि उपस्थितीच्या निकषांवर अस्लम शेख यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
तृतीय क्रमांक — ज्योती गायकवाड
काँग्रेस | गुण : ८०.३०
प्रश्नांची मांडणी, सभागृहातील सहभाग, उपस्थिती आणि लोकप्रतिनिधी म्हणून घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या निकषांवर ज्योती गायकवाड यांची कामगिरी चांगली राहिली.





