ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

धारावी पुनर्विकासाचे स्वप्न राहुल शेवाळेच पूर्ण करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावीच्या जाहीर सभेत व्यक्त केला विश्वास

प्रतिनिधी : राहुल शेवाळे हे स्वतः धारावीतून आलेले आहेत. धारावीतील लोकांच्या समस्यांची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे धारावीचा पुनर्विकास राहुल शेवाळेच करणार” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावी येथील जाहीर सभेत विश्वास व्यक्त केला. मंगळवार सायंकाळी धारावीतील कामराज हायस्कूल जवळ पार पडलेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. धारावीतून कोणालाही बाहेर काढले जाणार नसून सर्वांना धारावीतच घर दिले जाईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. या जाहीर सभेला तामिळनाडूचे भाजपा अध्यक्ष के अन्नामलाई, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, आमदार प्रसाद लाड, आमदार तमिळ सेलवन, आमदार सदा सरवणकर, अभिनेते दिगंबर नाईक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात धारावीकरांना पुनर्विकासाचे आश्वासन दिले. सर्वांना धारावीतच घर मिळेल, पुनर्विकास प्रक्रियेत धारावीतून एकही नागरिक बाहेर फेकला जाणार नाही आणि पुनर्विकासाचे स्वप्न महायुती सरकार पूर्ण करेल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. धारावीला धर्म ,जाती आणि पंथाच्या नावाने तोडणाऱ्या लोकांना येत्या 20 मेला चोख प्रत्युत्तर द्या, असे आवाहनही त्यांनी केले. धारावीतील गरिबांचे दुःख समजून घेऊ शकणारे राहुल शेवाळे यांनाच विजयी करा, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित जनतेला आवाहन केले. ज्यांना धारावीच्या गल्ल्यांमध्ये फिरणे देखील शक्य नाही अशा उमेदवाराला येत्या 20 मेला मतपेटीतून चोख उत्तर द्या असेही त्यांनी सांगितले.

राहुल शेवाळे यांनी आपल्या भाषणात धारावी पुनर्विकासासाठी गेल्या दहा वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याची माहिती जनतेला दिली. तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्पात कोणत्याही नागरिकाला धारावी बाहेर फेकले जाणार नाही, धारावीचा पुनर्विकास हा प्रत्येकाला मकान, दुकान देणारा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मुस्कान फुलवणारा असेल अशा शब्दात राहुल शेवाळे यांनी पुनर्विकासाची ग्वाही दिली.

Scroll to Top