ताज्या बातम्या
बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?कराड तालुक्यातील घोगाव येथे दुर्दैवी घटना‘बेस्ट’ संपावर तातडीने तोडगा काढून ‘नीट’ परीक्षार्थींना दिलासा द्या – माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

वारी साक्षरतेची : पंढरीच्या दारी शिक्षणाची जागृती

प्रतिनिधी : शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत दरवर्षी “वारी साक्षरतेची” उपक्रमाचे आयोजन केले जाते. देहू-पंढरपूर व आळंदी-पंढरपूर या दोन्ही पालखी मार्गांवर एक साक्षरता रथ शिक्षणाचा प्रचार प्रसार करत असतो. यावर्षी सुद्धा हा उपक्रम राबविण्यात आला.

या रथाच्या माध्यमातून पथनाट्य, बाहुली नाट्य, साक्षरता गीते, पपेट शो, साक्षरता घोषणा, घडीपत्रके, उपरणी, टोप्या, छत्र्यांचे वाटप अशा उपक्रमांद्वारे असाक्षर वारकऱ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाते. ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणीसह दिवेघाटात स्वयंसेवक शिक्षकांमार्फत प्रबोधनही झाले.

या उपक्रमाचा शुभारंभ शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, संचालक राहुल रेखावार, डॉ. महेश पालकर, कृष्णकुमार पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील अलका चौकात झाला.

“वारी साक्षरतेची हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे,” असे शिक्षण संचालनालयाचे भाऊसाहेब सरक यांनी सांगितले. नागसेन साबळे, करुणा साबळे, दीपक भुजबळ आदी स्वयंसेवक प्रचारकार्यात सक्रिय आहेत.

Scroll to Top