Sunday, June 1, 2025
घरमहाराष्ट्रगाई धर्मासाठी, व्यवसाय पोटासाठी!" – पण मुंबई पोलिसांनी थांबवलं; गोसावी महिलांची मुख्यमंत्री...

गाई धर्मासाठी, व्यवसाय पोटासाठी!” – पण मुंबई पोलिसांनी थांबवलं; गोसावी महिलांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धाव

मुंबई : मुंबईतल्या मंदिरांबाहेर गाई बांधून चारा विकणाऱ्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या महिलांचा संयम अखेर तुटला आहे! “गाई धर्मासाठी, व्यवसाय पोटासाठी – मग आम्हाला त्रास कशासाठी?” असा थेट सवाल करत या महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.

गेली ५० वर्षे या महिला मुंबईतील विविध मंदिरांबाहेर गाई ठेवून, श्रद्धाळूंना चारा व कोंड्याचे लाडू विकत आहेत. गाईंची सेवा आणि छोटा व्यवसाय – एवढ्याच जीवावर त्यांचा संसार चालतो. मात्र आता बीएमसी आणि पोलिसांच्या त्रासामुळे त्यांचे जगणे कठीण झाले आहे.

पोलिस आयुक्त कार्यालयातही नाकारले भेट

या महिलांनी पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्तांनी भेट नाकारली आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले – “मुख्यमंत्री यांच्याकडून पत्र आणा, मगच परवानगीचा विचार केला जाईल.” त्यामुळे महिलांना तिथूनही रिकाम्या हाताने परत जावे लागले.

“गाई फक्त सकाळी सात ते दुपारी एक मंदिराबाहेर असतात. तेवढ्याच वेळात आम्ही आमचा व्यवसाय करतो. कोणालाही त्रास नाही. तरीही अधिकारी हटवा हटवा म्हणतात, आम्ही नाहक भरकटतो आहोत,” असं महिलांचं म्हणने आहे. यावेळी निवेदन देताना श्रीमती कल्पना आनंद चव्हाण (अध्यक्ष), श्रीमती स्वाती सुरेश चव्हाण (खजिनदार) आणि सौ. नंदा कृष्णा शिंदे (सेक्रेटरी) यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments