Tuesday, June 24, 2025
घरमहाराष्ट्रनिसर्ग फाऊंडेशनच्या पुरस्काराने डाॅ.संदीप डाकवेंच्या ‘तात्या’ पुस्तकाचा सन्मान

निसर्ग फाऊंडेशनच्या पुरस्काराने डाॅ.संदीप डाकवेंच्या ‘तात्या’ पुस्तकाचा सन्मान

तळमावले/वार्ताहर : साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल निसर्ग फाऊंडेशन, लेंगरेच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्काराने लेंगरे येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळयात पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा यांच्या हस्ते ‘तात्या’ पुस्तकाचे लेखक डाॅ.संदीप डाकवे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर, आ.सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, श्रेयस उद्योग समूहाचे संस्थापक ॲड.बाबासाहेब मुळीक, माजी समाजकल्याण सभापती किसन जानकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संजय विभुते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.विक्रमसिंह कदम, प्रा.संजय ठिगळे, माजी सभापती मनीषा बागल, निसर्ग सखी मंच अध्यक्षा डॉ.वैशाली हजारे, सरपंच लक्ष्मीबाई पाटील, उपसरपंच झाकीर पठाण, माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख, निसर्ग फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन चंदनशिवे, सचिव नानासाहेब मंडलिक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थिती होती.
निसर्ग फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना निसर्ग सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डाॅ.संदीप डाकवे यांनी लिहलेले हे दहावे पुस्तक असून यामध्ये राजाराम डाकवे यांचा संपूर्ण जीवनपट अतिशय सुंदर पध्दतीने मांडला आहे. ग्रामीण भाशाशैलीचा बाज या पुस्तकात आहे. सुप्रसिध्द व्याख्याते आणि लेखक प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे यांची कसदार प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. क्यु आर कोडच्या माध्यमातून तात्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग यात पहायला मिळत आहेत. हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे. साहित्यिक क्षेत्रातील विविध दिग्गजांनी या ‘तात्या’ पुस्तकाचे कौतुक केले आहे.
‘तात्या’ या पुस्तकाला निसर्ग फाउंडेशनचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी डाॅ.संदीप डाकवे यांचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments