प्रतिनिधी : धारावीतील शास्त्रीनगर परिसरात राहणारे, शिवसेनेचे निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते किशोर कदम यांचे अपघाती निधन झाले आहे. मंगळवार रात्री काही कामानिमित्त आपल्या गावी निघाल्यानंतर बुधवारी पहाटे फलटण (जि. सातारा) येथे त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यांचे पार्थिव धारावी येथे आणले जाणार असून, आज रात्री ८ वाजता धारावी हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शिवसेना व धारावी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केला आहे. कट्टर शिवसैनिकाचा असा अचानक जाणं, हा शिवसेनेसाठी आणि परिसरासाठी मोठा धक्का आहे.