मुंबई : देवभूमी हिमालय यात्रेची जाहिरात करणारे स्वप्नील इंगळे आणि ह.भ.प. महेंद्र खोंड यांनी खालील नियमावलीचे प्रदर्शन मांडले. त्यांनी सांगितले की, १४४ वर्षानंतर येणार्या प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात आपले सर्वांचे स्वागत आहे. बुकिंग सुरू झाली आहे, आजच नाव नोंदवा. दि. ८ ते १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तुम्ही कधी येताय? आपला महाकुंभमेळ्याचा आरामदायक प्रवास एसी स्लीपर कोच लक्झरीमधून होणार. प्रत्येकी रु. १२,०००/- आणि मुंबईवरून येणार्यांसाठी प्रत्येकी रु. १३,०००/- असे सांगण्यात आले.
देवभूमी हिमालय यात्रा कंपनी आयोजित महाकुंभ प्रयागराज तीर्थ यात्रा २०२५
दि. ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता दादर (मुंबई) येथून प्रस्थान होईल. बुकिंगसाठी आजच संपर्क करा ७०२८२९३९९८. ही जाहिरात बघून बर्याच जणांनी बुकिंग केले.
सुरुवातीला दादर टी.टी.ला बस येणार सांगून नंतर यात्रेच्या आदल्या दिवशी वाशी ऑर्बिट मॉल येथे बस येईल म्हणून सांगितले. त्याशिवाय एसी बस सांगून फक्त स्लीपर बस आणली, परंतु त्यामध्ये एसी नव्हता, तिथेच सर्व प्रवाशांचे त्यांच्याबरोबर फोनवरून वाद सुरू झाले. विचारणा केल्यावर सांगितले की, बसमध्ये एसी सांगितलेच नाही. हे वक्तव्य स्वत:ला ह.भ.प. म्हणविणार्या महेंद्र खोंड यांनी केले. माझा आणि स्वप्निल इंगळे यांचा काहीही संबंध नाही, असे सांगितले. जाहिरातीत दोघांचीही नावे नंबरसहीत असूनही सर्व प्रवाशांची फसवणूक केली. बसमध्ये गाईड असेल असे सांगितले परंतु कोणीही गाईड नव्हता. ह.भ.प. महेंद्र खोंड यांनी आपले बरेचसे नातेवाईक एका बसमध्ये बसवून स्वत:ही त्यांच्यासोबत राहिले. त्यांचा वापर जेवण बनविण्यासाठी करण्यात आला. स्वप्निल इंगळे हे तर सुरुवातीला तोंड लपवून वाशीवरून सुटलेल्या गाडीत बसले होते. गाईडचा तर पत्ताच नव्हता. फोटोमध्ये दाखविलेली बस वेगळी आणि पाठविलेली बस वेगळी होती. विचारले तर उत्तर आले त्या गाडीला अपघात झाला त्यामुळे ही गाडी आली. गाडीच्या काचाही लागत नव्हत्या. मागच्या डीकीला लॉकही नव्हते. निदर्शनास आणल्यानंतर लॉक लावले गेले.
सुरुवातीला घरचे जेवण आणायला सांगितले होते. एका ठिकाणी बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन चालू होते, तिथे उघड्यावर जेवणास बसविले. तिथे हात धुण्यासाठी फक्त पाणी मिळाले. धुळीमध्ये बसावे लागले. आळंदीवरून दुसरी बस निघाली. एकूण ७० प्रवासी घेऊन दोन्ही बस आळंदीवरून रवाना करण्यात आल्या. नास्ता-जेवण दिले, नियमावलीत तीन दिवस रात्री मुक्काम असे सांगितले असतानासुद्धा संपूर्ण प्रवासात कोठेही राहण्याची व्यवस्था-पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही. ८ फेब्रुवारीला सकाळी बस सुटल्यापासून १५ फेब्रुवारीपर्यंत सतत बसने प्रवास सुरू होता. रात्री बसने प्रवास करून सकाळी शौचालयात किंवा नदीवर आंघोळीची सोय करत होते. नैसर्गिक विधी उघड्यावरच करावे लागत होते. ह.भ.प. महाराजांना सर्व प्रवाशांनी सांगितले की, रस्त्यावर नैसर्गिक विधीस बसणार नाही. आमची सोय करा. पण एकदाही त्यांनी आमची सोय केली नाही. रानावनात-जंगलात जिथे जेवण बनविण्यासाठी जागा असेल त्याठिकाणी त्यांची माणसे उघड्यावर जेवण बनवून देत असत. मातीत-धुळीत जेवण बनवून सर्व प्रवाशांना जेवायला उघड्यावर जेवण वाढायचे, त्याचा फोटोही सोबत जोडला आहे. हा यांच्या यात्रेचा फंडा. रात्री-अपरात्री रानावनात-जंगलात नैसर्गिक विधीसाठी बस थांबवत असे, तिथे एखाद्या श्वापदाने कोणाला दंश केला असता तर त्याला जबाबदार कोण होते? या सर्व प्रकारामुळे बर्याच जणांना युरीन इन्स्पेक्äशन झाले. उघड्यावर नैसर्गिक विधीस बसणे हे स्वच्छता अभियान विरुद्ध आहे, ‘स्वच्छ भारत, स्वच्छ अभियान’ला अक्षरश: काळीमा फासणारे हे ह.भ.प. अजून किती प्रवाशांची फसवणूक करणार आहे. त्यामुळे सगळ्या ट्रॅव्हल्स कंपनीला अटी लागू करण्यात याव्यात आणि तसे न केल्यास दंड किंवा कारवाई करावी. नदीवर अंघोळ केल्यावर ओले कपडे कुठे धुवायचे? कारण पवित्र नदीत कपडे धुणे पाप आहे म्हणून सहा दिवसाचे ओले कपडे बॅगेत घेऊन यात्रा करावी लागली. ही महिलांची सोय की गैरसोय? हे सरकारने आयोजकांना समजावून सांगावे किंवा कडक कारवाई करावी, ही माझी विनंती आहे. ज्या भारत देशात (हिंदू राष्ट्रात) महिलांना आदराने वागविले जाते, तिथे ही कुचंबणा कितपत योग्य आहे.
ह.भ.प. यांचे कुटुंबिय चहा-जेवण स्वत: बनवत असल्यामुळे ७० माणसांच्या जेवणाला ३-४ तास सहज जायचे. त्यामुळे दिवसभरातील ६-७ तास त्यातच जायचे. गर्दीमुळे दर्शन तर बर्याच ठिकाणी झाले नाही. बाहेरून कळसाचे दर्शन घेतले. नैसर्गिक विधीला स्वत:कडील पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन बर्याच जणांना जावे लागत होते. हात-पाय धुवायला पाणी नाही.
परतीच्या प्रवासात तर झाँशी येथे बॉर्डरवर बस अडविली असता परवाना नसल्यामुळे दंड भरून बस सोडविली. तसेच मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र बॉर्डरवर दुसरी बस अडविली असता तिथेही काही तडजोड करून बस सोडविली. त्यामुळे अयोध्यावरून गुरुवारी दुपारी ३.५० ला मुंबईकडे जाण्यासाठी बस निघाली. परंतु अनेक अडथळे पार करत ५०-५२ तासांचा बसमधून प्रवास करून प्रवासी तीन दिवसांनी म्हणजे शनिवारी रात्री १०.०० वाजता ठाणे-भिवंडी बायपास रोडवर आली. दोन दिवस कोणालाही आंघोळीची सोय न करता एखाद्या वैâद्याला जशी वागणूक असते त्याप्रमाणे सतत बसने प्रवास करावा लागला. अशा या स्वत:ला ह.भ.प. म्हणविणार्या माणसाने यात्रेचे आयोजन करणे कितपत योग्य आहे. त्याशिवाय त्याचे परवाना (लायसन्स) का जप्त करू नये? निदान बाकी महिलांची गैरसोय आणि विटंबना होऊ नये, ही माझी सरकारला कळकळीची विनंती आहे. स्वस्त दरात यात्रेच्या नावावर यात्रेकरूंची घोर फसवणूक करणार्या अशा प्रकारांना सरकार आळा घालेल का? विशेषत: महिला आणि पुरुषांनाही या प्रकाराचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यात्रेचे आयोजन करणार्या व्यक्तीला सरकारने नियमावली दाखवून द्यावी अन्यथा त्यांचे परवाने रद्द करावेत. केवळ पैसे घेऊन यात्रेला भाविकांची गैरसोय करणार्या आयोजकांना धडा शिकवावा.
बसमधील त्रस्त प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : मसुरकर, हळदीपूर, चव्हाण, धनू, पाटील, तामोरे, तांडेल, गिड्डे, शेट्टी आणि इतर.
दि. ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ठीक १० वाजता दादर (मुंबई) येथून प्रस्थान होईल. बुकिंगसाठी आजच संपर्क करा ७०२८२९३९९८. ही जाहिरात बघून बर्याच जणांनी बुकिंग केले.
सुरुवातीला दादर टी.टी.ला बस येणार सांगून नंतर यात्रेच्या आदल्या दिवशी वाशी ऑर्बिट मॉल येथे बस येईल म्हणून सांगितले. त्याशिवाय एसी बस सांगून फक्त स्लीपर बस आणली, परंतु त्यामध्ये एसी नव्हता, तिथेच सर्व प्रवाशांचे त्यांच्याबरोबर फोनवरून वाद सुरू झाले. विचारणा केल्यावर सांगितले की, बसमध्ये एसी सांगितलेच नाही. हे वक्तव्य स्वत:ला ह.भ.प. म्हणविणार्या महेंद्र खोंड यांनी केले. माझा आणि स्वप्निल इंगळे यांचा काहीही संबंध नाही, असे सांगितले. जाहिरातीत दोघांचीही नावे नंबरसहीत असूनही सर्व प्रवाशांची फसवणूक केली. बसमध्ये गाईड असेल असे सांगितले परंतु कोणीही गाईड नव्हता. ह.भ.प. महेंद्र खोंड यांनी आपले बरेचसे नातेवाईक एका बसमध्ये बसवून स्वत:ही त्यांच्यासोबत राहिले. त्यांचा वापर जेवण बनविण्यासाठी करण्यात आला. स्वप्निल इंगळे हे तर सुरुवातीला तोंड लपवून वाशीवरून सुटलेल्या गाडीत बसले होते. गाईडचा तर पत्ताच नव्हता. फोटोमध्ये दाखविलेली बस वेगळी आणि पाठविलेली बस वेगळी होती. विचारले तर उत्तर आले त्या गाडीला अपघात झाला त्यामुळे ही गाडी आली. गाडीच्या काचाही लागत नव्हत्या. मागच्या डीकीला लॉकही नव्हते. निदर्शनास आणल्यानंतर लॉक लावले गेले.
सुरुवातीला घरचे जेवण आणायला सांगितले होते. एका ठिकाणी बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शन चालू होते, तिथे उघड्यावर जेवणास बसविले. तिथे हात धुण्यासाठी फक्त पाणी मिळाले. धुळीमध्ये बसावे लागले. आळंदीवरून दुसरी बस निघाली. एकूण ७० प्रवासी घेऊन दोन्ही बस आळंदीवरून रवाना करण्यात आल्या. नास्ता-जेवण दिले, नियमावलीत तीन दिवस रात्री मुक्काम असे सांगितले असतानासुद्धा संपूर्ण प्रवासात कोठेही राहण्याची व्यवस्था-पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही. ८ फेब्रुवारीला सकाळी बस सुटल्यापासून १५ फेब्रुवारीपर्यंत सतत बसने प्रवास सुरू होता. रात्री बसने प्रवास करून सकाळी शौचालयात किंवा नदीवर आंघोळीची सोय करत होते. नैसर्गिक विधी उघड्यावरच करावे लागत होते. ह.भ.प. महाराजांना सर्व प्रवाशांनी सांगितले की, रस्त्यावर नैसर्गिक विधीस बसणार नाही. आमची सोय करा. पण एकदाही त्यांनी आमची सोय केली नाही. रानावनात-जंगलात जिथे जेवण बनविण्यासाठी जागा असेल त्याठिकाणी त्यांची माणसे उघड्यावर जेवण बनवून देत असत. मातीत-धुळीत जेवण बनवून सर्व प्रवाशांना जेवायला उघड्यावर जेवण वाढायचे, त्याचा फोटोही सोबत जोडला आहे. हा यांच्या यात्रेचा फंडा. रात्री-अपरात्री रानावनात-जंगलात नैसर्गिक विधीसाठी बस थांबवत असे, तिथे एखाद्या श्वापदाने कोणाला दंश केला असता तर त्याला जबाबदार कोण होते? या सर्व प्रकारामुळे बर्याच जणांना युरीन इन्स्पेक्äशन झाले. उघड्यावर नैसर्गिक विधीस बसणे हे स्वच्छता अभियान विरुद्ध आहे, ‘स्वच्छ भारत, स्वच्छ अभियान’ला अक्षरश: काळीमा फासणारे हे ह.भ.प. अजून किती प्रवाशांची फसवणूक करणार आहे. त्यामुळे सगळ्या ट्रॅव्हल्स कंपनीला अटी लागू करण्यात याव्यात आणि तसे न केल्यास दंड किंवा कारवाई करावी. नदीवर अंघोळ केल्यावर ओले कपडे कुठे धुवायचे? कारण पवित्र नदीत कपडे धुणे पाप आहे म्हणून सहा दिवसाचे ओले कपडे बॅगेत घेऊन यात्रा करावी लागली. ही महिलांची सोय की गैरसोय? हे सरकारने आयोजकांना समजावून सांगावे किंवा कडक कारवाई करावी, ही माझी विनंती आहे. ज्या भारत देशात (हिंदू राष्ट्रात) महिलांना आदराने वागविले जाते, तिथे ही कुचंबणा कितपत योग्य आहे.
ह.भ.प. यांचे कुटुंबिय चहा-जेवण स्वत: बनवत असल्यामुळे ७० माणसांच्या जेवणाला ३-४ तास सहज जायचे. त्यामुळे दिवसभरातील ६-७ तास त्यातच जायचे. गर्दीमुळे दर्शन तर बर्याच ठिकाणी झाले नाही. बाहेरून कळसाचे दर्शन घेतले. नैसर्गिक विधीला स्वत:कडील पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन बर्याच जणांना जावे लागत होते. हात-पाय धुवायला पाणी नाही.
परतीच्या प्रवासात तर झाँशी येथे बॉर्डरवर बस अडविली असता परवाना नसल्यामुळे दंड भरून बस सोडविली. तसेच मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र बॉर्डरवर दुसरी बस अडविली असता तिथेही काही तडजोड करून बस सोडविली. त्यामुळे अयोध्यावरून गुरुवारी दुपारी ३.५० ला मुंबईकडे जाण्यासाठी बस निघाली. परंतु अनेक अडथळे पार करत ५०-५२ तासांचा बसमधून प्रवास करून प्रवासी तीन दिवसांनी म्हणजे शनिवारी रात्री १०.०० वाजता ठाणे-भिवंडी बायपास रोडवर आली. दोन दिवस कोणालाही आंघोळीची सोय न करता एखाद्या वैâद्याला जशी वागणूक असते त्याप्रमाणे सतत बसने प्रवास करावा लागला. अशा या स्वत:ला ह.भ.प. म्हणविणार्या माणसाने यात्रेचे आयोजन करणे कितपत योग्य आहे. त्याशिवाय त्याचे परवाना (लायसन्स) का जप्त करू नये? निदान बाकी महिलांची गैरसोय आणि विटंबना होऊ नये, ही माझी सरकारला कळकळीची विनंती आहे. स्वस्त दरात यात्रेच्या नावावर यात्रेकरूंची घोर फसवणूक करणार्या अशा प्रकारांना सरकार आळा घालेल का? विशेषत: महिला आणि पुरुषांनाही या प्रकाराचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. यात्रेचे आयोजन करणार्या व्यक्तीला सरकारने नियमावली दाखवून द्यावी अन्यथा त्यांचे परवाने रद्द करावेत. केवळ पैसे घेऊन यात्रेला भाविकांची गैरसोय करणार्या आयोजकांना धडा शिकवावा.
बसमधील त्रस्त प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : मसुरकर, हळदीपूर, चव्हाण, धनू, पाटील, तामोरे, तांडेल, गिड्डे, शेट्टी आणि इतर.