सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्रात महायुतीचे डबल इनिंग सुरू झाल्यामुळे लाडक्या बहिणीला मनस्वी आनंद झाला. पण, आता लाडका काही भाऊ ठेकेदारीमुळे खूपच हलाकी मध्ये जीवन जगत आहे. एकेकाळी नेत्यांच्या मागे कांजी घालून हिंडणारे आता काही ठेकेदारांना बिगारी म्हणून काम करण्याची वेळ आलेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये हजार कोटीच्या निधीतून विकास कामे झाली. त्याची मोठ्या प्रमाणात जाहिरात व बॅनरबाजी खेड्यापाड्यात दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र ज्यांनी विकास कामांमध्ये प्रामाणिकपणाने घाम गाळला. अशा ठेकेदारांना अल्प मोबदल्यामध्ये व्यवसाय करणे फारच कठीण झालेले आहे. त्यांच्या अंगावरील कांजीचे कडक कपडे उतरले असून
बिगारी म्हणून उपजीविकेसाठी जाण्याची वेळ आलेली आहे.
खाजगीकरण व वशिलेबाजीमुळे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर होत असल्याने शासकीय व खाजगी नोकरी कमी झालेले आहेत. सातारा जिल्ह्यात नोकऱ्या नसल्यामुळे अनेक तरुण मुलं पंधरा ते वीस हजार रुपयांच्या दरमहा वेतनावर पुण्या, मुंबई, ठाणे शहरात अक्षरशः जीव धोक्यात घालून कामे करत आहेत. या उलट काही सधन व शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित तरुण स्वतः व्यवसायात उभे राहिलेले आहेत. त्यांनी वित्त संस्था, खाजगी बँका, पतसंस्था यामार्फत व्यवसायामध्ये कुठेतरी आपण टिकून राहावं यासाठी कर्ज काढून विविध प्रक्रिया पूर्ण केली. आता गावागावांमध्ये विकास कामे दिसतात पण ज्यांनी विकास काम केलेले त्यांचे फक्त नाव फलकावर दिसत आहेत .मात्र त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे.
उदाहरण द्यायचे झाले तर ज्यांचे कुटुंब फक्त बांधकाम व्यवसायावर अवलंबून आहेत .त्यांनी तर खाजगी सावकाराकडून पैसे घेऊन प्रत्येकाची टक्केवारी देऊन त्यांच्या हाती आता फक्त मुद्दल राहिलेली आहे. ती मुद्दल सुद्धा वेळेत न मिळाल्यामुळे त्यांच्यावर एक तर चोऱ्यामाऱ्या करणे ,लबाडी करणे अथवा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेले नाही. यापुढे मानवता भावनेतून बघणे गरजेचे आहे.
राजकीय नेत्यांच्या पुढे मागे काही ठेकेदार भैय्या,,साहेब, ,अण्णा, तात्या, आबा, काका ,मामा हे आपल्या व्यवसायासाठी हिंडत असतात. त्यामध्ये सर्वच लबाड नसता तर काही प्रामाणिक पण असतात आज त्यांच्यावर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. निविदा कलम दोन अंतर्गत काम वेळेत सुरू न केल्यास निविदाच्या दहा टक्के रक्कम सहा महिन्यात वसूल केली जाते. निविदा कलम३(क )नुसार काम काढून घेतले जाते. व्यवसायामध्ये निविदा घेतल्यानंतर कर्ज, कर्जाचे व वाहनाचे हप्ते, देणगी, नेत्यांच्या जाहिराती आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह याचे आर्थिक गणित जुळवता येत नाही. त्यातच अनामत रक्कम अडकून पडलेली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण, वित्त आयोग, तीर्थक्षेत्र पर्यटन विकास कार्यक्रम, स्मशानभूमी – अंगणवाडी- शाळेच्या खोल्या व बांधकाम त्याचबरोबर खासदार निधी ,आमदार निधी, जिल्हा परिषद सेस फंड, बी.ओ.टी.वार्षिक यात्रा नियोजन, रोजगार हमी योजना, व इतर विभागातील विकास कामे केली आहेत. या सर्वांची मिळून अठराशे कोटी रुपये देयक वाट पहात आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ भोसले, अक्षय फडतरे, सलीम शेख, मुजावर, जोशी, निकम, जाधव यांनी दिली. विकास कामे घेताना काहींचे हात ओले करावे लागतात. त्यांचा आपलं बरं चाललेलं आहे. पण, ठेकेदारांना आर्थिक अडचणीमुळे आता प्रतिष्ठा बाजूला ठेवून वास्तवता सांगावी लागत आहे. पाऊस पडला नाही आणि धरण जर भरले नाही तर पाझर तलावात पाणी कुठून येणार ?असा मार्मिक प्रश्न काही जण विचारत आहेत.
देयक थकल्याने ठेकेदारांची कांजी उतरून आता बिगारी म्हणून जाण्याची वेळ…
RELATED ARTICLES