Sunday, June 1, 2025
घरमहाराष्ट्रअभियानाच्या अगोदरच सातारा जि. प. मध्ये स्वच्छतेने झाली हाथ सफाई....

अभियानाच्या अगोदरच सातारा जि. प. मध्ये स्वच्छतेने झाली हाथ सफाई….

सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषदेच्या कर्तव्य दक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त अधिकारी व इतरांच्या प्रयत्नाने खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा परिषद कार्यालय व परिसर स्वच्छतेचा संदेश देत आहेत. गुरुवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सातारा जि प कार्यालयात व परिसरात स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. त्यापूर्वीच सातारा जिल्हा परिषद कार्यालय व परिसरात स्वच्छता युद्ध पातळीवर सुरू झाली आले. त्यामुळे या अभियानाचे खऱ्या अर्थाने स्वच्छतेचे पुनर्जीवन झाल्याचे समाधान अभयागतांना वाटू लागलेले आहे.सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. या दुर्गंधीमुळे येणाऱ्या अभ्यागातांना व मान्यवरांना सातारा जिल्हा परिषद सुंदर माझी कार्यालय वाटत नव्हते. ते वाटावे. यासाठी आतापर्यंत असं अभिनव अभियान कुणीही राबवले नव्हते. तीन वर्ष जिल्हा परिषदेच्या निवडणुका न झाल्यामुळे खऱ्या अर्थाने अनेकांची वर्दळ कमी झाल्यामुळे याबाबत फारच कुणाला त्याचे देणे घेणे नव्हते. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवण्यात येणार होते. जेव्हा वरिष्ठ अधिकारी स्वच्छतेबाबत हातात झाडू घेणार असतील तर आपली ही नैतिक जबाबदारी आहे .आपलंही पोट पाणी जिल्हा परिषद कार्यालयाच्या माध्यमातून भरत आहे. याची जाणीव ठेवून अनेक जण आता सहभागी झालेले आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या कार्यालयात अनेक बाबी घडत असतात पण त्या ठिकाणी नियमित येणाऱ्यांना तोंडावर बोट, डोळ्यावर पट्टी आणि कानाला हात लावून उर्वरित कार्यभागाचीच मांडणी करावी लागते. यामध्ये त्यांचाही दोष नाही शेवटी सिस्टीम मध्ये जे फीड केले जाते. तेवढेच आपल्याला करावे लागते. हे सुद्धा नाकारून चालणार नाही.
सातारा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समिती स्तरावर सुंदर माझे कार्यालय अभियान राबविण्यात सर्वात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी अनेक विधायक उपक्रम राबवली आहेत.
त्यामुळे वर्षानुवर्ष अडगळीत पडणारे साहित्य फर्निचर व टाकाऊ वस्तूंना आता खाऊलीच्या शासकीय गुदामामध्ये सन्मानाने जागा मिळालेली आहे. कचऱ्याची वाहतूक करताना काही कचरा रस्त्यावरती सांडला जातो. तसेच काही साहित्य सांडले असले तरी असून अडचण नसून खुळंबा झालेले साहित्य गेल्याचे समाधान अनेकांना वाटत आहे.
खऱ्या अर्थाने सातारा जिल्हा परिषदेमधील कार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांना सकारात्मक संदेश मिळाला आहे. त्याचाच भाग म्हणून सुंदर अभियान काळामध्ये दुपारी चार ते सहा या दोन तासाच्या कालावधीमध्ये व प्रत्येक शनिवारी कार्यालयाची आकर्षक रचना करावी व स्वच्छता राखावी. यासाठी चांगले धडे मिळाले आहेत. भविष्यात शक्य झाले तर भ्रष्टाचार मुक्त सातारा जिल्हा परिषद असे अभियान राबवण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कार्यालयात भ्रष्टाचाराच्या बाबत जातल उत्प प्रतिबंधक विभागालाही फलक लावण्याची आवश्यकता राहणार नाही याकडेही लक्ष द्यावे अशीही मागणी सामाजिक कार्यकर्ते मदन खंकाळ, रमेश गायकवाड, विजय ओव्हाळ, अझर शेख यांनी करून सातारा जिल्हा परिषदेच्या या स्वच्छतेबाबत मनापासून धन्यवाद दिले आहेत…………………………………
फोटो – सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात दिसणारा कचरा आता नष्ट होणार… (छाया- अजित जगताप सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments