Saturday, June 21, 2025
घरमहाराष्ट्रसाताऱ्यातील महोत्सवात गरिबांना पोटासाठी भिक मागण्या बंदी ..

साताऱ्यातील महोत्सवात गरिबांना पोटासाठी भिक मागण्या बंदी ..

सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहराने सर्वांना सामावून घेतलेले आहे. कोणताही भेदभाव केला नाही. परंतु, आता सातारातील एका महोत्सवामध्ये पोटासाठी भीक मागणाऱ्या गरिबांना हूसकावून लावण्यात आले .पोटासाठी भीक मागणाऱ्या गरिबांची चांगलीच तारांबळ उडाली.
सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर अनेकदा अनेक महिला बचत गट व उमेद आणि सामाजिक कार्याची ओळख निर्माण करणाऱ्या अनेकांनी महोत्सव आयोजित केले. त्याला उदंड प्रतिसाद लाभत असल्यामुळे महिला सक्षमीकरण व उद्योग महोत्सवातून अर्थकारण जपण्याचे काम होत आहे. अनेकांना रोजगार उपलब्ध झाल्यामुळे सध्या अशा महोत्सवात गर्दी होते .
गोरगरीब व भूमिहीन निवाराहीन तसेच विस्थापित काही कुटुंबातील सदस्य पोटाची खळगी भरण्यासाठी अशा गर्दीच्या ठिकाणी भीक मागत असतात. हे सामाजिक कार्यकर्त्यांसाठी कमीपणाचे आहे. त्यांच्यावर अशा पद्धतीने भीक मागण्याची वेळ आणली गेली. हेच मोठे दुर्दैव आहे.
त्याबाबत सर्वांनीच आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. परंतु, गर्दीच्या वेळेला अनेकांचे लक्ष विचलित झाल्यामुळे काही वेळेला चोरीची ही प्रकार घडतात. हे नाकारून चालणार नाही. काही महिला व लहान मुले हे पोटाची खळगी भरण्यासाठी पैसे मिळतील. या आशेने अशा सार्वजनिक ठिकाणी भीक मागत असतात. त्यांची ही नेहमीची स्टाईल असल्यामुळे त्यांनी मोठी उमेद घेऊन प्रवेश केला. परंतु त्यांना त्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षारक्षक व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अक्षरशः शोधून बाहेर काढले आहे. जणू काही गरिबांना या ठिकाणी भीक मागण्याचा अधिकारच नाही. अशा अविर्भावात काहींनी सातत्याने या गोष्टीची जाणीव जमलेल्या गर्दीला करून देत होते.
श्रीमंतांसाठी देणगी व शुल्क आणि गरिबांना पोटासाठी मागणी केली तर त्याला भीक म्हणतात का ? असा मार्मिक सवाल काही सुशिक्षित बांधवांनी करून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. वास्तविक पाहता अनेक महोत्सव भरतात. यामध्ये खरेदी विक्रीच्या व्यवहाराची माहिती फुगवून सांगितली जाते. पण, प्रत्यक्षात नेमकी खरेदी व विक्री किती झाली? हे गुलदस्त्यात असले तरी एकाच ठिकाणी अनेक वस्तू उपलब्ध होत असल्याने विशेषता महिलावर्ग आपल्या कुटुंबीयांसाठी भेट देतात. या ठिकाणी अनेक वस्तू उपलब्ध असल्या तरी बाजारभावापेक्षाही त्याच्या किमती जास्त असल्याची तक्रार काही ग्राहकांनी केली.
पाच हजार रुपयाची वस्तू दोन हजार रुपये किंमतीला आणि त्याला सवलत तीन हजार अशी आकडे मोड केली जाते. परंतु ग्राहक सुद्धा अभ्यासुवृत्तीनेच सर्व माहिती नेटवर्क घेऊनच ते व्यवहार करत असतात. तरीही अशा या महोत्सवामुळे काही व्यवसायिकांना चालना मिळते. तर काहींचे भांडवल सुद्धा निघत नाही. ही वस्तुस्थिती आहे. जे पोटासाठी भीक मागतात त्यांना बंदी घातल्यामुळे त्यांना अशा महोत्सवाला काहीच हाती लागत नसल्याची खंत मात्र मनाला वेदनादायक ठरत आहे. पैसा मिळवणे हा प्रत्येकाला अधिकार आहे मात्र त्या अधिकाराचा वापर मर्यादित लोकांपर्यंतच असल्यामुळे गरजूवंत व होतकर गरिबांनी विना कष्ट पैसे मागणे गुन्हा आहे. याची माहिती देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल. अशी प्रतिक्रिया उलट आहे……………………………….

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments