Monday, June 23, 2025
घरमहाराष्ट्रना मिळेना दिलासा तिळगुळ, चौकशी करतात नुसतेच काही बांडगुळ.... जावळी तालुक्यात चर्चा

ना मिळेना दिलासा तिळगुळ, चौकशी करतात नुसतेच काही बांडगुळ…. जावळी तालुक्यात चर्चा

मेढा(अजित जगताप) : छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यात अंधारी येथील संजय शेलार यांनी दोन जानेवारी रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणी नवीन वर्षातच जावली तालुक्याला धक्का बसला आहे. दोन आरोपी पोलिसांनी जेरबद केले . तर इतरांची चौकशी करून न्यायालयाचे आदेशाने सुटका केली. अंधारीत ना मिळणे दिलासा तिळगुळ.. पण चौकशी करतात काही बांडगुळ हे सुद्धा यानिमित्त पुढे आले आहे. काही प्रसार माध्यम वग्रामस्थांनी एकजुटीने हे प्रकरण लावून धरले. पण नि पण त्यांच्या अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण झाल्या.
सातारा जिल्ह्यात प्रसार माध्यम, पोलीस यंत्रणा व प्रशासनाबाबत नेहमीच टीकेची झोड उठवली जाते. पण नागरिकांची ही कर्तव्य असते. प्रथमदर्शनी पुरावा सापडल्यानंतर न्यायालयात हा पुरावा दाखल करून आरोपीला शिक्षा व्हावी. यासाठी प्रयत्न केला जातो. काही वेळेला जातीचे राजकारण घडले की अनेक संघटना आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. म्हणून निवेदन देतात. आंदोलन करतात. पण, एखादा गरीब व्यक्तीवर अन्याय झाला तर त्याच्यासाठी रस्त्यावर उतरण्यास कोणी तयार नसते. काही बांडगुळ प्रवृत्तीचे लोक फक्त चौकशी करतात पण धाडस दाखवत नाहीत. ही बाब सुद्धा संताप जनक वाटत आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट सातारा जिल्हा व अंधारी येथील काही ग्रामस्थांनी त्यांना साथ देणाऱ्या काही प्रसारमाध्यमांनी न्याय मागण्यासाठी ठोस भूमिका घेतली. अत्यंत जलदगतीने तपास करून गुन्हे उघड करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे. सातारा येथील अनेक आरोपी व गुन्हेगारांना २४ तासाच्या आत गजाआड केले. पुढे तपास यंत्रणेने निपक्षपातीपणे केलेल्या तपास व पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली आहे ..पण अंधारी बाबत काही जण नशीबवान ठरले. हिंदी चित्रपटातील गीत आहे.
सागर जैसी आखे वाले, ये तो बता तेरा नाम है क्या ? पण या प्रकरणी नामोल्लेख टाळण्याची किमया कोण करत आहेत. हे आता गुलदस्त्यात असले तरी कानून की हाथ लंबे है! हे कधीतरी उघड होणार आहे. कर नाही तर डर कशाला? एवढं सुद्धा संबंधितांना विचारण्याचे धारिष्ट तपास यंत्रणेकडे नाही. हे सुद्धा जनतेने पाहिले आहे. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करण्याचे दिवस संपल्याचे चिन्ह दिसत आहे.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेने मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या खुनाचा तपास सुरू केला. तेव्हापासून आतापर्यंत जनतेमधील चर्चा कुणी थांबवू शकले नाही. नेमका कुणाचाही दबाव नव्हता पण आता त्यांच्या नावाने दबाव असल्याचे चित्र निर्माण केले जाते. यामध्ये व्यावसायिक संघर्ष सुद्धा असू शकतो. तसेच अनेक गोष्टीचा उलघडा धाडसी पत्रकारांनी करून आपली पत्रकारिता जपली आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीवर आरोप झाल्यानंतर त्याला फोनवरून दमदाटी करून पोलीस ठाण्यात बोलवले जाते पण, या ठिकाणी वेगळ्या न्याय दिला जात असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करून सामान्यांच्या न्यायासाठी महत्वपूर्ण भूमिका घेतली. जर एखादी व्यक्ती दोषी नसेल तर त्याची बदनामी होत असेल तर तेही दुर्दैव आहे. या सर्व प्रकरणाकडे पाहताना माणुसकी शून्य कामगिरी जर होत असेल तर लोकशाहीच्या कथित खांबाचे बारीक तुकडे करून ते पाणी तापवणाऱ्या बंबात टाकावे. अशी बोलकी प्रतिक्रिया सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी करून डोळ्यात चांगलेच अंजन घातले आहे याचा तरी विचार व्हावा हीच अपेक्षा आहे.
__________________________________________

चौकट २० जानेवारी १९७४ साली सामना चित्रपट प्रदर्शित झाला चित्रपटाच्या माध्यमातून मारुती कांबळेचे काय झाले ? असा प्रश्न उपस्थित केला होता. आजही पन्नास वर्षांनी असाच प्रश्न विचारला जात आहे. मात्र त्यासाठी कुटुंबीयांनाच रस्त्यावर आंदोलन करावे लागतात. हे मात्र खरे… आता कांबळेच काय पण शेलार चाही प्रश्न विचारण्याचे धारिष्ट राहिले नाही का ? असा सामान्य वाचक विचार करू लागलेले आहेत.

______________________________
मयत संजय शेलार यांचा त्यावेळी चा मृत्यू देह

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments