कराड (प्रतिनिधी) : भैरवनाथ विद्यालय येवती महासोली येथील सन 1993 च्या दहावीतील बॅचच्या विद्यार्थ्यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून आपल्या वेळी असणाऱ्या शिक्षकांचा देखील सत्कार करून त्यांचे ऋण फेडले,यावेळी हा कार्यक्रम 1993 च्या दहावीतील बॅचचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आयोजित केला होता ,ते तब्बल 31 वर्षांनी भेटले एवढ्या वर्षांनी भेटून देखील त्यांनी आपली मैत्री कायम ठेवली याचेच सर्वत्र कौतुक होताना दिसत होते ,यावेळी या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका जयमाला पाटील ,माजी उपशिक्षिका जयश्री थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती , यावेळी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना थोरात मॅडम म्हणाल्या की खरोखरच 1993 सालची दहावीची बॅच आदर्श बॅच म्हणून गणली जाते, खूप हालाखीच्या परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले ,त्यावेळी आदर्श शिक्षक आणि आदर्श विद्यार्थी यांच्यामध्ये ऋणानुबंध होते ,याचीच आठवण म्हणून त्यांनी आज माझा सत्कार केला याबद्दल मला त्यांचा खूप अभिमान आहे यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून भविष्यात देखील 1993 च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी या शाळेसाठी भरिव अशी मदत देण्याचे आश्वासन दिले ,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 1993 दहावी बॅचचे विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते….
तब्बल ३१ वर्षांनी भेटले दहावीतील मित्र आणि मैत्रिणी; शाळेचे ऋण फेडण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना केले शालेय साहित्याचे वाटप ..
RELATED ARTICLES