Monday, September 8, 2025
घरमहाराष्ट्रसंविधान-आरक्षणाचे राजकारण करून महाराष्ट्राला जातीय संघर्षात लोटणा-या महाविकास आघाडी व महायुतीला मतदारांनी...

संविधान-आरक्षणाचे राजकारण करून महाराष्ट्राला जातीय संघर्षात लोटणा-या महाविकास आघाडी व महायुतीला मतदारांनी पराभूत करावे. – अॅड. (डॉ.) सुरेश माने

प्रतिनीधी : छत्रपती शिवराय फुले-शाहू व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रगत व पुरोगामी महाराष्ट्रात भारतीय संविधान, संविधानात्मक आरक्षण धोरणाचे स्वार्थी व व्होटबँकपोटी, राज्य विधानसभा निवडणूकीत भाजपा प्रणित महायुती तर्फे व काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीतर्फे दिशाहीन, घराणेशाहीचे, सग्यासोय-यांच्या हिताचे सत्ताकारण केले जात असून पुरोगामी महाराष्ट्राला महायुती व महाआघाडीच्या दर्जाहिन व जनतेच्या हिताविरूध्दचे जातीय संघर्षाचे राजकारण केले जात असून अशा दृष्य व अदृष्य जातीयवादी व बहुजनविरोधी दोन्ही आघाडीतील उमेदवारांना राज्यातील मतदारांनी पराभूत करावे व संविधानवादी “आरक्षणवादी आघाडीला” राज्यात सत्ता द्यावी असे राज्यातील १२ कोटी जनतेला “आरक्षणवादी आघाडी” चे आव्हान आहे.

महाराष्ट्रातील ही विधानसभा निवडणूक ‘संविधान-लोकतंत्र बचाव’ या मुद्यांशी केंद्रभूत नसून राज्यात जातीयवादी भुमिकेतून आरक्षण सारख्या संविधानात्मक धोरणाला जातीय विव्देश व राजकीय ध्रुवीकरणासाठी महायुती व आघाडीतर्फे गैरवापर करून महाराष्ट्रात जातीय संघर्षाचा ज्वालामुखी पेटविण्यासाठी मराठा विरूध्द ओबीसी, ओबीसी विरूध्द आदिवासी, अनुसूचित जाती-जमातीचे उपवर्गीकरण, आदीवासींचे डिलिस्टींग (आदीवासींना गैरआदीवासी ठरविणे) एकसंघ ओबीसींचे आरक्षण नावाखाली तुकडेकरण करने तर मुस्लीमांचे ५ टक्के शैक्षणिक आरक्षण नाकारने, अशा उच्च जाती केंद्रित सत्ताकरणाला पराभूत करण्यासाठी व संविधानात्मक आरक्षण धोरण व याव्दारे ‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी’ या सामाजिक व आर्थिक लोकशाहीचा पाया असणा-या संविधानवादी धोरणांच्या विजयासाठी “आरक्षणवादी आघाडी” राज्यात विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढविणार आहे.

राज्यातील प्रस्थापित ६ राजकीय पक्षांनी महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केल्यामुळेच शेतकरी विद्यार्थी, सरकारी कर्मचारी व लाखो बेरोजगार युवा हे भविष्याच्या चिंतेत असून राज्यात महाविकास आघाडी व महायुतीच्या भ्रष्ट, घराणेशाहीप्रधान व जातीयवादी राजकारणांने राज्याला आर्थिक कर्जदार केले असून सरकारच्या आर्थिक उघळपट्टीमुळे जनतेच्या विविध कल्याणकारी योजनांना कात्री लावली असून राज्याला बेहिसाब उधळपट्टीव्दारे कर्जबाजारी केले आहे.

राज्यात सध्या आघाडी व युतीमध्ये घराणेशाहीचे, पक्षांतरांचे आयाराम-गयाराम पर्व सुरू असून कोण सेक्यूलर व कोण संघवादी हा जनतेचा समारेचा प्रश्न आहे तर आजचा उद्या संघशाखेत जाणार नाही तर संघवाला-जातीयवादी सत्तेसाठी आघाडीसोबत राजकीय हनीमून करणार नाही याची हमी राज्यातील आघाडी-युती नेते देवू शकत नाहीत, तर विशिष्ट भांडवलदारांचे हित जपण्यासाठी व राज्यातील जल, जमीन, जंगल व इतर संसाधने भ्रष्टाचारी उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी हे आघाडी व युतीवाले नेते-पक्ष एकत्र होणार नाहीत याची हमी कुणीच देवू शकत नसल्यामुळे राज्यघटना विरोधी, जातीयवादी भ्रष्टाचारी घराणेशाहीची मक्तेदारी मिरविणारी, चुकीची आर्थिक व सामाजिक धोरणे, शिक्षण-राजगार धोरणे राबविणा-या प्रस्थापितांच्या राजकारणाला पराभूत करून सुसंस्कृत, सर्व समाजघटकांच्या विकासकांच्या राजकारणासाठी व संविधानात्मक आरक्षण धोरणाच्या संवर्धनासाठी राज्यातील जनता “आरक्षणवादी आघाडी” ला प्रचंड बहुमताने निवडूण देईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments