प्रतिनिधी(रमेश औताडे) : मुंबईतील सर्व उड्डाणपूल व प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी. अपघात टाळण्यासाठी त्वरित दुरुस्तीची उपाययोजना करावी. खड्डे दुरुस्तीसाठी आतापर्यंत किती निधी खर्च झाला याची संपूर्ण आकडेवारी जाहीर करावी. भविष्यात उड्डाणपुलांची गुणवत्ता व देखभाल सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या मागण्या करत बांद्रा येथील एम.एस.आर.डी.सी. कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ॲम्बुलन्स घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
रराज्य सरकार व एम.एस.आर.डी.सी. प्रशासनाला मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले, उपाध्यक्ष ओमकार शिर्के, जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर, सचिन लोंढे आणि इमरान तडवी, सेलवेन देवेंद्र, हनीफ पटेल, वैभव पांचाळ, कमलेश दांडेकर, लक्ष्मण बाजी, स्वप्निल पाटील यांनी इशारा दिला आहे की या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करू.