प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात महानगरपालिका कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी आझाद मैदानात एल्गार मोर्चा काढण्यात आला.
घन कचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत कचऱ्याचे संकलन, परिवहन आणि विल्हेवाट या अनुषंगाने १४ मे २०२५ रोजी काढलेले टेंडर रद्द करण्यात यावे. पालिकेने उपनगरीय रुग्णालये सार्वजनिक खाजगी तत्वावर देण्याचा पालिकेने प्रशासनाने घेतलेला निर्णय कायस्वरूपी रद्द करावा. सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात यावे. सर्व संवर्गातील रिक्त पदे भरती प्रक्रियेने तसेच पदोन्नतीची पदे तातडीने भरण्यात यावीत. मुंबई महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या भरतीमध्ये कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे. २३ फेब्रुवारी २०२४ चा लाड पागे समितीच्या शिफारशी विषयक महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी. राज्य सरकारच्या शासन निर्णयाप्रमाणे सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे देण्यात यावीत.
सफाई खात्याचे शंभर टक्के खाजगीकरण करण्याचा निर्णय घेऊन कामगारांवर संभाव्य संप आंदोलन लादत आहे. जर संप आंदोलन झाल्यास त्याला महापालिका प्रशासनच जबाबदार असेल. असे
म्युनिसिपल मजदूर युनियन चे अध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितले. यावेळी बाबा बाबा कदम अध्यक्ष म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, शशांक राव अध्यक्ष दि म्युनिसिपल युनियन, प्रकाश जाधव सरचिटणीस म्युनिसिपल मजदूर संघ, शेषराव राठोड कार्याध्यक्ष मुंबई म्युनिसिपल कामगार संघ, मिलिंद रानडे सरचिटणीस कचरा वाहतुक श्रमिक संघ, वामन कविस्कर निमंत्रण म.न.पा. कामगार संघटना संघर्ष समिती व हजारो कामगार कर्मचारी उपस्थित होते.