२०१० मध्ये आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (ILO) घरकामगारांना कामगाराचा दर्जा देणारा १८९ क्रमांकाचा ठराव मंजूर केला होता. मात्र, आजतागायत भारतात केंद्रीय घरकामगार कायदा अस्तित्वात नाही. उत्तराखंडमधील एका घरकामगार महिलेच्या शोषणाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तातडीने कायदा करण्याचा आदेश दिला असून, त्यासाठी समिती गठीत करण्यास सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर देशभरातील संघटना घरकामगारांच्या हक्कासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. कार्यक्रमाला राजू वंजारे, ज्ञानेश पाटील, शांता खोत, मंगला बावस्कर, ललिता सरोदे, निता मोहिते, आशिष शिगवण, यासिन कुरेशी आदी उपस्थित होते. माध्यमांनी या कार्यक्रमाला योग्य प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले.