सातारा(अजित जगताप) : सर्वच राजकीय पक्षांना नेते व कार्यकर्ते पुरवठा करणाऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अंधारातही मशाल पेटवली आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या निवडीने साताऱ्यातील सामान्यांच्या आशा पल्लवीत झालेले आहेत. साताऱ्यात काँग्रेसच्या हाती क्रांतीची मशाल पेटल्याने सामान्यांच्या तुतारीला बळ मिळाल्याची चर्चा सुरू झालेली आहे.
रक्तदाता दिन शनिवार दिनांक १४ जून रोजी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेससाठी आता नवी पिढी रस्त्यावर उतरणार होते परंतु विमान अपघाताने तीन दिवसाचा दुखावटा पाळण्यात आला. त्यामुळे हा मशाल मेळावा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. मशान मोर्च्याच्या पुढील तारीख जाहीर झाल्यानंतर याच दिवशी दुपारी तीन वाजता सातारा येथील काँग्रेस भवन मध्ये ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतीश पाटील, आ. विश्वजीत कदम ,डॉ. इंद्रजीत मोहिते व राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये ८ आमदार आणि ४६ विधान भवनचे आमदार स्टिकर लावून आमदारांच्या समर्थक व नातेवाईकांचे वाहने भरधाव वेगाने खुलेआम रस्त्यावर फिरत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सामान्यांच्या हाती मशाल घेऊन रस्त्यावरून राष्ट्रीय काँग्रेस मार्गक्रमण करत आहे.
सामान्यांच्या वेदना दुःख हाल अपेष्टा व अपेक्षा दाबण्यात येत आहे. त्या मशालीच्या उजेडामध्ये शोधून त्यांना न्याय देण्याची भूमिका आता युवा नेते रणजीतसिंह देशमुख यांना करावे लागणार आहे. सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्षाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे त्यांच्या निवडीने काँग्रेस पक्षामध्ये चैतन्य निर्माण झालेले आहे. ज्यांनी कधीही काँग्रेस वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट काँग्रेसच्या छायेखाली स्वतःच भलं करून घेतले. आज ते काँग्रेस सोडून गेले असले तरी अनेक जण काँग्रेस प्रवाहामध्ये सामील झालेले आहेत. हे सातारा जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.
साताऱ्यातील ऐतिहासिक संदर्भ असलेल्या काँग्रेस भवन येथून भव्य मशाल मोर्चा पवई नाका मार्ग राजवाडा असा होणार असून गांधी मैदानावर या मशाल मोर्चाचे विसर्जन केले जाणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कदम यांनी दिली आहे. या मशाल मोर्चाचे नियोजन करण्यासाठी काँग्रेसचे निष्ठावंत पाईक जगन्नाथ कुंभार, रजनी पवार, राजेंद्र शेलार, डॉ. महेश गुरव, इम्तियाज बागवान, निलेश घार्गे , बाबुराव शिंदे ,नरेश देसाई, मनोज कुमार तपासे, अन्वर पाशा खान, सुनील उबाळे, संदीप माने यांच्यासह युवक, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती जमाती, महिला पदाधिकारी सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे या मशाल मोर्चा ने सातारा जिल्ह्यात राजकीय विरोधकांचे अस्तित्व दिसून येणार असून सरकारच्या विरोधात आता तोफ डागली जाणार आहे. हे मात्र निश्चित झाले आहे.
फोटो — राष्ट्रीय काँग्रेस सातारा जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह देशमुख