Monday, June 23, 2025
घरमहाराष्ट्रमदर डेअरीची जागी अदीनीस देण्याचा निर्णय... हा शेतकऱ्यांवर घाला आहे....

मदर डेअरीची जागी अदीनीस देण्याचा निर्णय… हा शेतकऱ्यांवर घाला आहे….

प्रतिनिधी : मुंबईतील कुर्ला पूर्व येथे राज्य शासनाच्या दुग्धविकास विभागाची 21 एकर जागा असून हे ठिकाण मदर डेरी म्हणून ओळखले जाते. येथील 21 एकर पेक्षा अधिकची जागा ही महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितसंबंधाकडे दुर्लक्ष करणारा हा निर्णय आहे अशी टीका धारावी बचाव आंदोलनाचे नेते आणि माजी आमदार बाबुराव माने यांनी केली आहे.या मदर डेअरीची जागा आदानी कंपनीस देण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या हितसंबंधावर हा घाला आहे असे बाबुराव माने यांनी ही बोचरी टीका करताना म्हटले आहे. याच कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर बोटॅनिकल गार्डन, वृक्ष संवर्धन प्रकल्प उभा करणार, मुंबईकरांसाठी प्राणवायू, ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणार असे चार महिन्यांपूर्वी सारखे सांगितले जात होते.प्रत्यक्षात मदर डेरीची मोक्याची जागा ही अदानी कंपनीस देऊन तेथे उभा राहणारा एक निसर्ग प्रकल्प (बोटॅनिकल गार्डन) तर बारगळलाच आहे. शिवाय 21 एकर जागेवर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एखादा दुग्धजन्य प्रकल्प उभारता आला असता तो प्रकल्प उभारण्याचे टाळून दुग्ध विकास विभागाने एक प्रकारे अदानी विकासाला प्राधान्य दिल्याचे दिसते असेही बाबुराव माने यांनी यासंदर्भात टीका करताना खोचकपणे म्हटले आहे.
विकासक या शब्दाचा अर्थ बिल्डर, डेव्हलपर. त्याला समजा एक एकर जागा विकास करण्यासाठी दिली तर तो ती एक एकर जागा विकसित करून ठराविक घरे मूळ जागेतील लोकांसाठी बांधतो आणि स्वतःसाठी व्यापारासाठी काही फ्लॅट,दुकाने, गाळे बांधतो.तेंव्हा त्याला एक एकर जागेच्या बाहेर ना सरकार जमीन देते ना खाजगी मालक. येथे म्हणजे धारावीत मात्र अदानी कंपनीस घरांच्या पुनर्वसनासाठी 500 पेक्षा अधिक जमीन दिली जाणार आहे. तरीही अदानी कंपनीला मुलुंड, कांजूर,देवनार, कुर्ला मदर डेरी आदी ठिकाणी जमीन दिली जाते. उद्या याच धरतीवर इतर बिल्डर, विकासक हे सुद्धा मूळ जागेबरोबरच अन्य ठिकाणीही आम्हाला जमिनी द्या अशी मागणी करतील. त्यावेळेला अशा बिल्डरांची मागणी पूर्ण करणे मोठे अवघड काम होऊन जाईल याकडेही बाबुराव माने यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

*प्रशासनाचे धारावी प्रेम की अदानी प्रेम*
झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी बाहेरची जमीन देण्याचा प्रकार नव्हता, ज्या जागेवर झोपडपट्टी असेल तेथेच पुनर्वसनाची व विक्रीची घरे बांधली जात होती. धारावीकरांबाबत मात्र सगळ्याच गोष्टींचा अपवाद केला जात आहे. हे धारावी प्रेम आहे की अदानी प्रेम, असा सवाल धारावी बचाव आंदोलनाचे नेते बाबुराव माने केला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments